माझ्या नजरेतून - १
शकले झाली तरीही अंध....
हिंदुस्थानी समाजात ब्रिटिशांनी तेढ निर्माण केली आणि हिंदु- मुस्लीम अशी तेढही जाणीवपूर्वक निर्माण केली. जी पूर्वी असणारी मुस्लीम आक्रमकांची भाषा त्यांनी स्वातंत्र्यचळवळीतही अतिशय बेभानपणे वापरून मुस्लीम नेतृत्वाला प्रक्षोभक बनवले धूर्तपणे हे सारे करीत त्यांनी याच हिंदुस्थानातील हिंदुचाही त्यासाठी वापर केला हे नाकारता येणार नाही. तसेच ब्रिटिशांच्या या खेळीला बळी पडलेले हिंदुही काही अजाणतेपणे बळी पडले गेले नाहीत, असेही खेदाने नमूद करावेसे वाटते. जर तथाकथित धर्मनिरपेक्षतेच्या शिकवणुकीतून भारतीय स्वातंत्र्य मिळाले आणि तगले आहे, असा विचार केला तर धर्मनिरपेक्षता या कथित अपुरोगामी संकल्पनेला मिळालेले आजचे राजकीय स्वरूप नक्कीच भस्मासुरी बनले आहे.
![]() |
| चित्रकार- योगेंद्र पाटील |
कम्युनिस्टांच्या मते धर्म म्हणजे अफुची गोळी आहे. ते धर्म ही संकल्पना या पद्धतीने पाहातात, स्वीकारतात. ती योग्य वा अयोग्य आहे, तिचा प्रत्यक्षात असणारा वावर, पडणारा प्रभाव, होणारे परिणाम याचा विचार केला तर धर्म ही संकल्पना आज नाकारता येत नाही. ती योग्य असो वा अयोग्य ती समाजात, वा वास्तवात प्रभावीपणे अंमलात आलेली आहे. हे लक्षात घेतले पाहिजे. इतकेच नव्हे तर एकेकाळी धर्मासंबंधात तो नाकारणाऱ्या साम्यवाद्यांनीही नंतर धर्म या संकल्पनेला नाकारलेले नाही, हे ही लक्षात घेतले पाहिजे. धर्म या संकल्पनेला भारतामध्ये असणारे महत्त्व तर अतिशय अनन्यसाधारण आहे. ऐतिहासिकच नव्हे तर प्राचीन कालापासून धर्म या अस्तित्त्वात आहे, तो विविध पद्धतीने आहे, त्यामुळे एका संस्कृतीची जडणघडण झालेली आहे, एका संस्कृतीवर अन्य धर्माच्या आक्रमकांनी राज्यप्रसार आणि धर्मप्रसारासाठी विद्यमान भारत वा हिंदुस्थानावर आक्रमणे केली. धर्मांतरे केली, क्रूरपणे लोकांच्या कत्तली केल्या, येथील मंदिरांसारख्या, विद्यापीठासारख्या महत्त्वाच्या वास्तुंनाही उद््ध्वस्त केले. हा इतिहास आहे, तो लपवण्याचा जरी कोणी प्रयत्न केला तरी तो लपण्यासारखा नाही, हे देखील सत्य आहे. अर्थात हिंदुस्थानात भूतकाळात जे काही झाले, जी काही धर्मांतरे झाली, त्यातून बाहेर पडून स्वतंत्रपणे समाजाने उभारी घेण्याचा प्रयत्न केला का, तशा प्रकारचे तत्त्वज्ञान जेत्यांनी तरी नीटपणे या हिंदुस्थानी समाजासाठी रुजवलेले नाही. हिंदुस्थानी समाजात ब्रिटिशांनी तेढ निर्माण केली आणि हिंदु- मुस्लीम अशी तेढही जाणीवपूर्वक निर्माण केली. जी पूर्वी असणारी मुस्लीम आक्रमकांची भाषा त्यांनी स्वातंत्र्यचळवळीतही अतिशय बेभानपणे वापरून मुस्लीम नेतृत्वाला प्रक्षोभक बनवले धूर्तपणे हे सारे करीत त्यांनी याच हिंदुस्थानातील हिंदुचाही त्यासाठी वापर केला हे नाकारता येणार नाही. तसेच ब्रिटिशांच्या या खेळीला बळी पडलेले हिंदुही काही अजाणतेपणे बळी पडले गेले नाहीत, असेही खेदाने नमूद करावेसे वाटते. जर तथाकथित धर्मनिरपेक्षतेच्या शिकवणुकीतून भारतीय स्वातंत्र्य मिळाले आणि तगले आहे, असा विचार केला तर धर्मनिरपेक्षता या कथित अपुरोगामी संकल्पनेला मिळालेले आजचे राजकीय स्वरूप नक्कीच भस्मासुरी बनले आहे. अल्पसंख्याकांना जगातील अन्य देशातही कुठे कोणी इतके काही भरभरून दिले नाही. मात्र एकेकाळी हिंदुस्थानावर आक्रमक म्हणून आलेल्यांनी आपला धर्मही या हिंदुस्थानातील (त्याला प्राचीन भारत म्हणा वा आर्यावर्त म्हणा) समाजावर लादला. वैदिक- सनातन धर्म पाळणाऱ्या, त्यातून निघालेल्या विविध पंथ पाळणाऱ्या समाजावर बाह्य आक्रमकांचा धर्म इतका लादला गेला की त्या मुस्लीम आक्रमकांच्या धर्म लादण्यामुळे धर्मांतरित झालेल्या त्यांच्या आजच्या वंशजांनाही आपला मूळ धर्म या भूमीमध्ये होता त्याचा विसर पडला आहे. इतका विसर पडला की, आज त्यामुळे त्यांची पुण्यभू ही भारत- हिंदुस्थान नसून त्या बाहेर असलेल्या अन्य देशांतील आहे. त्या आक्रमकांच्या भारतबाह्य पुण्यभू असलेल्या धर्माच्या शिकवणुकीने त्यांचे मूळ हिंदू असलेले वंशज आता आपल्या त्या मूळ धर्मालाही शत्रुवत वा पराभूतांचा वा गुलामांचा धर्म अशा त्या समाजातील मानू लागले आहेत.
(क्रमश:)
- रवींद्र यशवंत बिवलकर

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा