सावरकर : काल, आज आणि उद्या
माझ्या नजरेतून - २
सावरकरांच्या तत्त्वज्ञानाचे अर्धज्ञान घातक
चित्र- चित्रकार योगेंद्र पाटील, पाचोरा
समाजसुधारक गोपाळ गणेश आगरकर यांच्या बुद्धिवादाच्या परंपरेचे स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर हे क्रांतिकारक पाईक म्हणावे लागतात. राष्ट्र ही संकल्पना प्राचीन हिंदुकालात मांडली गेली असल्याचे अनेकांचे, काही हिंदुत्ववाद्यांचे दावे आहेत. विशेष करून पूर्वपरंपरा, रिती रिवाज, संस्कृती या घटकांचे संदर्भ देत अनेक हिंदुधर्मनिष्ठ राष्ट्र ही संकल्पना अस्तित्त्वात होती, असे सांगतात. तर सावरकर हे आधुनिक काळातील हिंदुस्थानची व्याख्या करतात, किंबहुना त्यांच्या व्याख्येत कालापलीकडे पाहाण्याचही इच्छा आहे. इतकेच नव्हे तर हिंदुराष्ट्र ही संकल्पना भूमिनिष्ठ आणि राष्ट्रीय, राष्ट्रनिष्ठ दृष्टीने स्वीकारतात. तसेच हिंदुत्व हे तत्त्व याच भूमिनिष्ठ, राष्ट्रनिष्ठ भूमिकेतून मांडताना समाजाला अद्ययावत बनवू पाहातात.

| चित्र- चित्रकार योगेंद्र पाटील, पाचोरा |
वस्तुस्थिती आणि इतिहास, तसेच सत्य नाकारून धर्माच्या पोथिनिष्ठतेपुढे माना झुकवणाऱ्यांच्या मानसिकतेमुळे देशाला स्वातंत्र्य मिळूनही बहुसंख्य आणि अल्पसंख्य नागरिक आजही विज्ञाननिष्ठतेऐवजी पोथिनिष्ठ धर्म, आणि प्राचीन परंपरा, रिवाज यांच्या विळख्यात गेले आहेत. केवळ नागरिक नव्हे तर आजचे राजकारण, तथाकथित विविध विचारसरणी, इतकेच नव्हे तर अगदी धर्मनिरपेक्ष म्हणवणारे राजकीय स्रोत आणि त्यांचे वंशजही खऱ्या अर्थाने विज्ञानवादी, विज्ञाननिष्ठ युगातील अद्ययावत होण्यास तयार नाहीत. ही स्थिती केवळ आजची नाही, तर अगदी स्वातंत्र्यपूर्व काळातीलही होती, अशी विविध उदाहरणेही त्या अनुषंगाने आढळून येतील. अशा या परिस्थितीत स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी मांडलेले समाजसुधारणेसंबंधातील विचार हे म्हणजे एक तत्त्वज्ञानच आहे.
समाजसुधारक गोपाळ गणेश आगरकर यांच्या बुद्धिवादाच्या परंपरेचे स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर हे क्रांतिकारक पाईक म्हणावे लागतात. राष्ट्र ही संकल्पना प्राचीन हिंदुकालात मांडली गेली असल्याचे अनेकांचे, काही हिंदुत्ववाद्यांचे दावे आहेत. विशेष करून पूर्वपरंपरा, रिती रिवाज, संस्कृती या घटकांचे संदर्भ देत अनेक हिंदुधर्मनिष्ठ राष्ट्र ही संकल्पना अस्तित्त्वात होती, असे सांगतात. तर सावरकर हे आधुनिक काळातील हिंदुस्थानची व्याख्या करतात, किंबहुना त्यांच्या व्याख्येत कालापलीकडे पाहाण्याचही इच्छा आहे. इतकेच नव्हे तर हिंदुराष्ट्र ही संकल्पना भूमिनिष्ठ आणि राष्ट्रीय, राष्ट्रनिष्ठ दृष्टीने स्वीकारतात. तसेच हिंदुत्व हे तत्त्व याच भूमिनिष्ठ, राष्ट्रनिष्ठ भूमिकेतून मांडताना समाजाला अद्ययावत बनवू पाहातात. सबळ, सामर्थ्यवान देश करून जगाच्या स्पर्धेत शक्तिशाली कसे बनता येईल, त्यासाठी झगडतात. बदलत्या कालाबरोबर, त्यातील नवनव्या विचारांना सामोरे जातही आपल्या हिंदुनिष्ठ भूमिकेला ते नवा बळकट पाया देण्याचे काम करताता, हा पाया आहे, विज्ञानाधारित भूमिनिष्ठ हिंदुधर्माचा. हा त्यांचा धर्म हिदुंच्या प्राचीन परंपरा, इतिहास, संस्कृती अशा वारशाला डोळसपणे जपूनही नवकालाला, आधुनिकतेला अद्ययावत संस्कारांना स्वीकारणारा. त्यामुळेच त्यांचा हा हिंदुपणा किंवा हिंदुत्वाचा पाया पारंपरिक, रिवाजाधारित, श्रुतिस्मृतिपुराणोक्त धर्माला- सामूहीक वर्तनाला वा त्या संलग्न हिंदुधर्माला झुगारणारा आहे. ते केवळ ही संकल्पना भारतीय उपखंडातील एकाच धर्मालाही लावू पाहात नाहीत, तर अन्य धर्मांमधील श्रुतिस्मृतिपुराणोक्त गृहितकांनाही ते बाजूला सारण्यासाठी आवाहन करतात.
त्यांचा हा धर्म यामुळेच नव्या पिढीला दिशादर्शक ठरू शकतो. कारण तो बुद्धिवादी आहे तो विचारपूर्वक वागायला शिकवणारा आहे, तो 'आसिंघु-सिंधुपर्यंता यस्य भारतभूमिका।' या भूमिकेला ग्राह्य मानून या भूमीतील मूल समाजधर्माशी, पंथ, गट यामधील व्यक्ती आणि व्यक्तीसमूहांना आक्रमकांपासून झालेल्या हिंसक वृत्ती आणि हिंसकतेमुळे दबल्या गेलेल्या समाजाला जगातील भूमिचे महत्त्व सांगत- लक्षात आणून देत त्यांना तुम्ही या भूमीचे आहात आणि ही भूमी तुमची आहे. जगात अन्यत्र तुम्हाला स्वत:ची भूमी नसल्याचे वास्तव स्पष्ट करणारा आहे. यामुळेच आक्रमकांच्या जोखडापासून मुक्त करून, मानसिक, बौद्धिक, भावनिक अशा गुलामगिरीपासूनही मुक्त व्हा, असे सांगणारा सावरकरांचा हिंदुत्वाचा वा हिंदुपणाचा अभिनिवेश नीट लक्षात घ्यावा लागतो. तो नीट लक्षात न घेतल्याने हिंदुस्थानातील हिंदु- आहिंदु यांचेही मोठे नुकसान स्वतंत्र भारतातीली त्रिशंकू अशा धर्मनिरपेक्षतेच्या विचारसरणीने वा शिकवणुकीने झाले आहे. त्यामुळे खरी धर्मनिरपेक्षताच संबंधितांना नीट उमगली नसल्याने आजही कोणीतरी अल्पसंख्याकांना घाबरून, त्यांच्यापुढे लाचार बनून धर्मनिरपेक्षतेचा आव आणल्याचे राजकारण खेळत आहे.
क्रांतिकारक सावरकर हे केवळ सशस्त्र क्रांतिकारकांचे मार्गदर्शक नव्हेत तर नव्याने उभारी घेत असलेल्या नव्या युगातील भारतीय उपखंडाचे मार्गदर्शक तत्त्वज्ञानी होते. ब्रिटिशोत्तर भारताला आधुनिकतेच्या जीवनविचारांकडे नेऊ पाहाणारे, अद्ययावत मानसिकतेला स्वीकारण्यासाठी व्यक्तिवादाला जोपासून ( - व्यक्तिवादाला बाजूला सारून वा कोणावर जबरदस्ती करून नव्हेे) सावरकरांचे हिंदुत्वाचे, विज्ञाननिष्ठतेचे, अद्ययावत समाज निर्मितीचे, राष्ट्राला शस्त्रसमर्थ बनविण्याचे, आक्रमकांच्या इतिहासातून शहाणे होत, हिंदुंनी शस्त्रसज्ज, संरक्षण शिक्षण घेत राष्ट्र बळकट करावे, हे तत्त्वज्ञान देत, यंत्रयुगाला स्वीकारणारे सावरकरयुगच संकल्पित केले. मात्र त्यांचे हे युग, त्यांच्या तत्त्वज्ञानाची वैशिष्ट्ये, त्यांच्या तत्त्वज्ञानातील, विचारामधील मूळ प्रवाहाला स्मरत जात, व्यावहारिकतेला, उपयुक्ततेला, अर्थ देणारी धोरणे अधिक सूक्ष्मपणे पाहाणे गरजेचे आहे. त्यांच्यामते धर्माचे असणारे महत्त्व आणि भूमीचे असणारे अधिष्ठान याची त्यांच्या विज्ञाननिष्ठ समाजाला सुधारणेकडे नेणारी दिशा ही क्रांतिकारक होती, ती कशी ते पाहण्याचा माझा प्रयत्न आहे. या प्रयत्नात सर्वांना समानतेच्या स्तरावर आणण्यासाठी व्यक्तिवादही संवेदनशीलपणे जोपासणाऱ्या आणि इतिहासाच्या देदिप्यमान काळाला तसेच त्यातील अत्याचारी राजवटींनाही लक्षात घेत भूमिनिष्ठ हिंदुत्व मांडत, विज्ञाननिष्ठ धर्माला साकारण्याचा प्रयत्न करणाऱ्या सावरकरांना अधिकाधिक शोधण्याची ही धडपड आहे. त्यांनी मांडलेल्या सावरकर युगाचा विद्यमान स्थितीतही विजय झालेला नाही, पराभव पाहावा लागत आहे, ही शोकांतिका आहे, असे मात्र राहून राहून वाटते.
(क्रमश:)
- रवींद्र यशवंत बिवलकर
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा