सोमवार, २९ मे, २०२३

   सावरकर : कालआज आणि उद्या  

माझ्या नजरेतून -

धर्म... लौकिक आणि पारलौकिक 

हिंदुत्वाला न समजून घेता सावरकरांवर टीका करणाऱ्यांनाही विशेष करून डाव्या वा सावरकर विचारविरोधकांना त्यांचा बुद्धिवाद झेपला नाहीकदाचित त्यांच्या बुद्धीला ते स्वीकारावयाचे नव्हतेयाचे कारण हिंदु या शब्दाबद्दल असणारी या विरोधकांची वा डाव्यांची आडमुठी वा पूर्वग्रहदूषित वृत्तीही कारणीभूत ठरली आहे.  सावरकर यांच्या हिंदुत्वाबद्दलहिंदुअहिंदु व्याख्येबद्दल तसेच अन्य धर्मांच्या संबंधातील टिप्पणींबद्दल काही सांगण्याआधी त्यांच्या बुद्धिवादधर्माच्या लौकिक आणि पारलौकिक घटकांचा विचार पाहाण्यासारखा आहेत्यामुळे सावरकरी हिंदुत्व नेमके कळण्यासही सुलभ होऊ शकेलअसे वाटते.

धर्म लौकिक वा पारलौकिक अशा दोन्ही दृष्टीने स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी सूक्ष्मपणे विचार केला आहेतार्किक आणि तात्त्विक  दोन्ही पद्धतीने ते धर्म संकल्पनेचा विचार करतातमात्र हे सर्व करीत असताना त्यांचा निष्कर्ष ते ज्या पद्धतीने मांडताततो बुद्धिवादी आहेविज्ञानाचिकित्सेला मानणारा आहे आणि तर्कशास्त्रालाही धरून ते संयमितपणे आपले मत व्यक्त करतातकिंबहुना यामुळेच त्यांच्या मनातील धर्माच्या संकल्पनेबद्दल अनेक हिंदुत्ववाद्यांना ते स्वीकारण्याचे धाडस झाले नाहीते सावरकरांना आपल्याच मानसिकतेतून गृहित धरून पाहातात. त्यांनी सावरकरांना त्याच मानसिकतेमधून स्वीकारले, मानले आणि जाणलेतर हिंदुत्वाला न समजून घेता सावरकरांवर टीका करणाऱ्यांनाही विशेष करून डाव्या वा सावरकर विचारविरोधकांना त्यांचा बुद्धिवाद झेपला नाहीकदाचित त्यांच्या बुद्धीला ते स्वीकारावयाचे नव्हतेयाचे कारण हिंदु या शब्दाबद्दल असणारी या विरोधकांची वा डाव्यांची आडमुठी वा पूर्वग्रहदूषित वृत्तीही कारणीभूत ठरली आहे.  सावरकर यांच्या हिंदुत्वाबद्दलहिंदुअहिंदु व्याख्येबद्दल तसेच अन्य धर्मांच्या संबंधातील टिप्पणींबद्दल काही सांगण्याआधी त्यांच्या बुद्धिवादधर्माच्या लौकिक आणि पारलौकिक घटकांचा विचार पाहाण्यासारखा आहेत्यामुळे सावरकरी हिंदुत्व नेमके कळण्यासही सुलभ होऊ शकेलअसे वाटते.

सावरकरांचा बुद्धिवादी विचार आहेहे अनेकांना पटत नाहीकारण ते सावरकरांना हिंदु धर्माच्या जातीय गटामध्ये बसवतातत्यामुळे सावरकरांसारख्या विज्ञाननिष्ठभूमिनिष्ठ आणि राष्ट्रनिष्ठ हिंदुत्व मानणाऱ्याहिंदुत्व सांगणाऱ्या व्यक्तीने नेमके हिंदुत्व काय सांगितले आहेहेच अनेकजणांना उमजत नाही तर काही जाणीवपूर्व डोळेझांक करतातधर्म या संबंधात सावरकरांच्या तत्त्वज्ञानाचा लौकिक आणि पारलौकिक अशा दोन्ही अंगाने विचार करता त्यांच्या तार्किकतात्विक दृष्टिकोनातील सखोलसंयमित विचारधारणेची महत्तता कळून येतेआजही त्यांच्या काळाचा विचार करता ते यामुळेच अद्ययावत वाटतातफक्त तो अद्ययावतपणा पाहाण्याची आपल्यामध्ये बुद्धी हवीतशी नजर हवीतसा तटस्थपणाही हवा.

या अनुषंगाने सावरकरांची विधाने लक्षात घेण्यासारखी आहेत.

।। ईश्वरजीवजगत यांच्या स्वरुपाचे नि परस्परसंबंधांचे आस्तिरुप वा नास्तिरुप असे त्रिकालाबाधित नियम असलेच पाहिजेतत्याचप्रमाणे जन्ममृत्युपूर्वजन्मस्वर्गनरक याविषयीही जी कोणती वस्तुस्थिती असेल ती निश्चितपणे सांगणारे ज्ञानही त्रिकालाबाधित म्हणवून घेण्यास पात्र असणारचयास्तव या पारलौकिक प्रकरणीचे सिद्धांतही सनातन धर्म म्हणजे शाश्वतअपरिवर्तनीय धर्म होत यात शंका नाही.

।। निश्चित झालेल्या वैज्ञानिक नियमाप्रमाणे धर्मग्रंथातील हे पारलौकिक वस्तुस्थितीचे वर्णन प्रत्यक्षनिष्ठ प्रयोगाच्या कसोटीस मुळीच उतरत नाहीतसारी भिस्त बोलून चालून एका शब्दप्रामाण्यावरआप्तवाक्यावरविशिष्ट आंतरअनुभूतीवर अवलंबून असते.

।।  काही मर्यादेपर्यंत प्रत्यक्षानुमानिक प्रमाणास अविरुद्ध असणारे शब्दप्रमाण व आप्तवाक्य हेही एक प्रमाण आहेच आहे.

 (क्रमश:)

रवींद्र यशवंत बिवलकर

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

फिर सुबह होगी .... पण कधी?

सुबह कभी तो आयेगी... हे गाणे आज नेहरूवादी नसलेल्या  व नेहरूंच्या राजवटीवर आसुड ओढणाऱ्या विचारसरणीच्या सत्ताधारी ‘भाजपवादी’ अशा १० वर्षांच्या...