रविवार, २८ मे, २०२३

  सावरकर : कालआज आणि उद्या   

माझ्या नजरेतून -

चित्र- चित्रकार योगेंद्र पाटील, पाचोरा

झुंड धर्मांच्या झुंजीतच लुप्त 

प्रकाशउष्णतागतीगणितगणितज्योतिषध्वनीविद्युत चुंबकरेडियमभूगर्भशरीरवैद्यकयंत्रशिल्पवानस्पत्य जैवआणि तत्सम जी प्रयोगक्षम शास्त्रे (सायन्सेसआहेत त्याचे जे प्रत्यक्षनिष्ठ आणि प्रयोगसिद्ध नियम आज मनुष्यजातीस ज्ञात झालेले आहेत तोच आमचा खरा सनातन धर्म होयते नियम आर्यांसाठीमुस्लिमांसाठी वा काफरांसाठीइस्रायलींसाठी वा हीदनांसाठी अवतीर्ण झालेले नसून ते स र्व मनुष्यमात्रास नि:पक्षपाती समानतेने लागू आहेतहा खरा सनातन धर्म आहेइतकेच नव्हेतर हा खरोखर मानवधर्म आहेहा केवळ 'कृते तु मानवो धर्मः’ नाहीतर त्रिकालाबाधित मानवधर्म आहेम्हणूनच त्यास सनातन हे विशेषण निर्विवादपणे लागू पडते.’

सावरकरांची धर्मासंबंधातील चिकित्सा अतिशय वास्तववादी आहेकिंबहुना नव्या कालाच्या दिशेने जगात होणाऱ्या बदलाची चाहुलच त्यांना लागलेली होतीत्यामुळे नजीकच्या काळात नागरी संस्कृतीचा होणारा कायापालट त्यांना स्वातंत्र्यापूर्वी बराच काळ आधी बौद्धिक स्तरावर पाहाता आलामात्र आजही त्यांच्या त्या स्तरापर्यंत आम्ही जाऊ शकलो नाहीतत्यामुळेच भारतात फाळणीनंतरही ना मुस्लीम बदलू शकले ना हिंदूना स्थैर्य मिळू शकलेप्रत्येकाची झुंड धर्मांच्या झुंजीतच लुप्त होत असल्याचे अतिशय विदारक सत्य आज पाहावे लागत आहे.

सनातन आणि धर्म याचे अतिशय सूक्ष्म विवेचन सावरकरांनी केले आहेत्यामुळे सनातन धर्म ही एकच पदवी सरसकट पद्धतीने देताना मानवी बुद्धीच चुकली असल्याचे ते सांगतातत्यामुळे रुढ अर्थच या संबंधातील विसंवादाला कारण आहे.

सावरकर म्हणतात त्यानुसार ‘सनातन शब्दाचा मुख्य अर्थ शाश्वतअबाधितअखंडनीयअपरिवर्तनीय धर्महा शब्दइंग्रजी ‘लॉ’ या शब्दाप्रमाणेच आणि तसाच मानसिक प्रक्रियेमुळे पुष्कळ अर्थांतरे घेत आला आहे.

 प्रथम त्याचा मूळचा व्यापक अर्थ नियमकोणत्याही वस्तूच्या अस्तित्वाचे नि व्यवहाराचे जो धारणनियमन करतो तो त्या वस्तूचा धर्मसृष्टीचे धर्मपाण्याचे धर्मअग्नीचे धर्म प्रभृती त्यांचे अपयोग या व्यापक अर्थीच होतात.  याच व्यापक अर्थामुळे पारलौकिक आणि पारमार्थिक पदार्थाच्या नियमांसही धर्मच म्हणण्यात येऊ लागलेमग ते नियम प्रत्यक्षागत असोत वा तसे भासोत!

स्वर्गनरकपूर्वजन्मइश्वरजीवजगत यांचे परस्परसंबंधया साऱ्यांचा समावेश धर्म या शब्दातच केला गेलाइतकेच नव्हे तर हळूहळू तो धर्म शब्द या त्याच्या पारलौकिक विभागार्थीच विशेषेकरून राखून ठेवल्यासारखा झालाआज धर्म शब्दाचा विशेष अर्थ असा हाच होतोकीया अर्थी धर्म म्हणजे 'रिलिजन.'

यावर सावरकर थांबत नाहीतते त्यापुढे जाऊन धर्म या शब्दाचे अधिक विश्लेषण करतातत्यामुळे ते सांगतात की, ‘मनुष्याचे जे ऐहिक व्यवहार वरील पारलौकिक जगतात त्यास अपकारक ठरतीलसे वाटलेत्या पारलौकिक जीवनात त्याचे धारण करतील असे भासलेतेही धर्मच मानण्यात आलेइंग्लीशमध्ये मोसेसअब्राहाममहंमद प्रभृती पैगंबरांच्या स्मृतीतही अशाच खच्चून असलेल्या साऱ्या कर्मकांडास 'लॉ'च म्हटले आहेया अर्थी धर्म म्हणजे आचार.   शेवटी वरील आचार वगळून मनुष्यामनुष्यांतील जे केवळ ओहिक प्रकरणीचे व्यवहार असतात त्या व्यक्तीच्या वा राष्ट्राच्या वर्तननियमांसही पूर्वी धर्मच म्हणतस्मृतीत युद्धनीतीराजधर्मव्यवहारधर्म प्रभृती प्रकरणांतून हे गोवलेले असतातपण आज यांपैकी पुष्कळसा भाग स्मृतिनिष्ठ अपरिवर्तनीय धर्मसत्तेतून निघून आपल्या इकडेही परिवर्तनीय मनुष्यकृत नियमांच्या कक्षेत शास्त्रीपंडितांनाही निषिद्ध न वाटावा इतक्या निर्विवादपणे समाविष्ट झालेला आहेजसे गाडी हाकण्याचे निर्बंधशिवीगाळचोरीइत्यादिकांचे दंडविधान तो निर्बंधशासनाचा ( कायदेशासनाचाप्रदेश होयआपल्या अलीकडे धर्म शब्द आज जसा 'रिलिजनया विशेषार्थी राखीव झाला आहेतसाच इंग्लीशमध्ये 'लॉहा शब्द विशेषार्थी या निर्बंध शासनास आज वाहिला जात आहेया प्रकरणी धर्म म्हणजे निर्बंध (कायदा 'लॉ').’

 सनातन आणि धर्म या शब्दांच्या अर्थाची निष्पत्ती सावरकरांनी विस्तृतपणे केली आहेत्यांनी सनातन म्हणजे काय हे सांगताना स्वमत परखडपणे व्यक्त केले आहेते सांगतात की, ' याचा अर्थ म्हणजे   नियमअपरिवर्तनीयजे बदलू नयेत इतकेच नव्हेतर जे बदलणे मनुष्याच्या शक्तीच्या बाहेरची गोष्ट आहे असे अबाधित जे धर्म असतीलनियम असतीलत्यासच सनातन धर्म ही पदवी यथार्थपणे देता येईलइतकेच नव्हे तर सावरकर म्हणतात की, ‘ मनुष्याच्या ज्ञानाच्या आटोक्यात जे जे सृष्टिनियम आणि जी जी वैज्ञानिक सत्ये आज आलेली आहेत त्यांसत्यांसच आम्ही आमचा सनातन धर्म समजतोनिःशेष परिगमनास्तव नव्हेतर दिग्दर्शनार्थ म्हणून खालील नामोल्लेख पुरे आहेत. '

प्रकाशउष्णतागतीगणितगणितज्योतिषध्वनीविद्युत चुंबकरेडियमभूगर्भशरीरवैद्यकयंत्रशिल्पवानस्पत्य जैवआणि तत्सम जी प्रयोगक्षम शास्त्रे (सायन्सेसआहेत त्याचे जे प्रत्यक्षनिष्ठ आणि प्रयोगसिद्ध नियम आज मनुष्यजातीस ज्ञात झालेले आहेत तोच आमचा खरा सनातन धर्म होयते नियम आर्यांसाठीमुस्लिमांसाठी वा काफरांसाठीइस्रायलींसाठी वा हीदनांसाठी अवतीर्ण झालेले नसून ते सर्व मनुष्यमात्रास नि:पक्षपाती समानतेने लागू आहेतहा खरा सनातन धर्म आहेइतकेच नव्हेतर हा खरोखर मानवधर्म आहेहा केवळ 'कृते तु मानवो धर्मः’ नाहीतर त्रिकालाबाधित मानवधर्म आहेम्हणूनच त्यास सनातन हे विशेषण निर्विवादपणे लागू पडते.’

सावरकरांच्या या चिकित्सेतून धर्म आणि विशेष करून सनातन धर्म याचे विवेचन करीत मिळालेली दिशा ही सावरकरांच्या तार्किक आणि बुद्धिवादी भूमिकेला स्पष्ट करतेहिंदुअहिंदु याची व्याख्या करताना सावरकरांनी यामुळेच भारताच्या वा हिंदुस्थानाच्या स्थानमहतीची मांडलेली संकल्पना ही यामुळेच अधिक तर्कशुद्ध आणि चपखल वाटतेकारण हिंदुत्व ही संकल्पना याच धर्माच्या अनुषंगाने मांडली आहे आणि त्यामागे असणारे सावरकरांचे दृष्टिकोन हे अधिक तार्किक आणि राष्ट्रनिष्ठ ठरतातमानवी समाजधर्म याची संकल्पना त्यांना अतिशय बारकाईने समजलेली वाटतेत्यामुळेच त्यांनी धर्म या संकल्पनेला हिंदुंसाठी भूमिनिष्ठ आणि विज्ञाननिष्ठ बनवले आहेयामधूनच त्यांनी समाजसुधारणा करण्यासाठी रत्नागिरीत असताना स्थानबद्धतेच्या काळात जे कार्य आरंभिले ते हिंदुंसाठी दिशादर्शक होतेइतकेच नव्हे तर त्यावेळी लिहिलेल्या हिंदुत्व पुस्तकातूनही त्यांनी केलेले दिग्दर्शन स्पष्ट होतेहे सारे करीत असताना त्यांनी हिंदुधर्माने पूर्वापार टाकलेल्या सात बेड्यांना वा शृंखलांना तोडले ही बाबही त्याकाळातील अतिशय महत्त्वाची घटना होतीत्याचे महत्त्व खरे म्हणजे हिंदु धर्मातील सनातन्यांनीही समजून घ्यायला हवे होतेअनेकदा अशा प्रकारच्या वर्तनातून केवळ ठरावीक उद्दिष्ट साध्य होत असते असे नाही तर त्यातून नव्याने पाऊल टाकण्यास सुरूवात झालेली असतेजुन्या जुनाट आणि कालबाह्य होऊ शकणाऱ्या संकल्पनांना आणि रिवाजांना समजून त्या कालाप्रमाणे बाद करण्याचाही संकेत या त्यांच्या सात बेड्या तोडण्याच्या कृतीमुळे झाला होतामात्र तो हिंदुंनी आजही समजून घेतलेला नाहीआजही अशा अनेक प्रकारच्या शृंखला तोडण्याची गरज आहेमात्र हे करताना प्रत्येकजण ज्ञानेश्वर होणे गरजेचे आहे पण दुसऱ्याच्या घरात... अशा भूमिकेत असल्याने अशा या हिंदु समाजाला पुन्हा मनुवादी धर्माला चिकटण्याची वृत्ती गेल्या काही वर्षांमध्ये तयार झालीत्याला कारणे अनेक आहेतपरंतु आजही त्यामुळे  पुन्हा कोणी  सावरकर निर्माण होईल कायाची वाट पाहात बसल्यासारखे हिंदु बसून आहेतहे दुर्दैव आहेवास्तविक व्यक्तिवाद अतिशय तरलतेने समजलेल्या सावरकरांनी समाजासाठी जुन्या परंपरांही दुसऱ्या व्यक्ती करीत असतील तर ते स्वीकारले होतेत्यांनी त्यांच्या व्यक्तीस्वातंत्र्यामध्ये अडथळा आणला नव्हताही भूमिका अतिशय समंजस असूनही आणि प्रत्येक मानवाला त्याचा तो व्यक्तिस्वातंत्र्याचा अधिकार असतोहे स्वीकारण्याची परिपक्वता त्यांच्यामध्ये होतीत्यामुळे खरे म्हणजे साक्षर होत असलेल्या हिंदु समाजाने भूमिनिष्ठ हिंदुत्व स्वीकारतानाच बुद्धिवादी हिंदुत्वही स्वीकारण्याकडे कल तरी दाखवावयास हवा होतामात्र तसे न होताफाळणीपूर्वीच्या आणि फाळणीनंतरच्या भारतीय स्वातंत्र्यामध्ये झालेल्या विविध राजकीय घडामोडींमधून स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी जो हिंदु संकल्पिला होतात्या हिंदु समाजाला मात्र व्यक्तिवादाची विज्ञानिष्ठ बौद्धिक उंची काही गाठता आली नाहीसंघटनात्मक कार्यामध्ये या उंची ऐवजी मनुवादी दृष्टीला महत्त्व दिले गेल्याने आज हिंदु मतांचे ध्रुवीकरण राजकीय स्तरावर झाले असले तरी सामाजिक आणि समाजबौद्धिक स्तरावर हिंदुनेसचे ध्रुवीकरण झाले नाहीविज्ञानाची फळे ऐहिकदृष्टीने हिंदु चाखत असले तरी त्या विज्ञानाच्या कसोटीवर धार्मिक प्रथा-परंपरा,संस्कृती ही अद्ययावत काळातील विज्ञानयुगातही पारखली जाणे नक्कीच गरजेचे आहे.

या सर्व पार्श्वभूमीवर देश म्हणून विवेचन करताना मुस्लीम वा अहिंदु समाजासाठीही स्वतंत्र भारतात वा हिंदुराष्ट्रात काय स्थान असेल ते सांगताना त्यांनी मांडलेली भूमिकाही तितकीच सुस्पष्ट होती ...

(क्रमश:)

- रवींद्र यशवंत बिवलकर

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

फिर सुबह होगी .... पण कधी?

सुबह कभी तो आयेगी... हे गाणे आज नेहरूवादी नसलेल्या  व नेहरूंच्या राजवटीवर आसुड ओढणाऱ्या विचारसरणीच्या सत्ताधारी ‘भाजपवादी’ अशा १० वर्षांच्या...