रविवार, २६ फेब्रुवारी, २०२३

 गांधीजींच्या तीन माकडांची गोष्ट ( भाग २)


गांधींना चीनचे एक प्रतिनिधी मंडळ भारतात आले असताना भेटले व त्यावेळी त्यांनी या तीन माकडांच्या प्रतिकृती त्यांना भेटीदाखल दिल्या होत्या. गांधीजी त्यांना नेहमी आपल्या जवळही ठेवीत असत. ही तीन माकडे ही शहाणी माकडे असल्याचे मानले जाते. जी अधिक प्रसिद्ध पावली आहेत मात्र आतापर्यंत एकंदर ६ माकडांचा उल्लेख  केला जातो. त्यात चौथे माकड शिजारू नावाचे असून  पाच आणि ६ क्रमांकाची माकडेही आहेत मात्र ती बनावट असल्याचे मानले जाते.


भारतात तीन माकडांचे पुन्हा आगमन झाले तेही स्वातंत्र्यपूर्व काळात. १९३३ मध्ये. साबरमतीच्या आश्रमात एक जपानी भिख्खूने भेट दिली.  तेव्हा त्यांनी गांधीजींना तेथे ही तीन माकडे भेट दिली. एका बातमीनुसार ती माकडे बापू, केतन आणि बंदर अशा नावाने ती तीन माकडे भारतात प्रसिद्ध पावली होती. गांधीजींना भेट दिलेली ही तीनही माकडे चिनी मातीच्या द्वारे तयार केलेल्या मूर्तीमध्ये भेट दिलेली होती. अलीकडच्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनॉल्ड ट्रम्प यांनाही त्यांच्या भारतभेटीमध्ये या माकडांची प्रतिकृती भेट दिली होती. गांधीजींना दिलेली ती तीन माकडे आता दिल्लीत राजघाटावरील गांधी संग्रहालयात ठेवलेली आहेत.

अन्य एका दाव्यानुसार गांधींना चीनचे एक प्रतिनिधी मंडळ भारतात आले असताना भेटले व त्यावेळी त्यांनी या तीन माकडांच्या प्रतिकृती त्यांना भेटीदाखल दिल्या होत्या. गांधीजी त्यांना नेहमी आपल्या जवळही ठेवीत असत. ही तीन माकडे ही शहाणी माकडे असल्याचे मानले जाते. जी अधिक प्रसिद्ध पावली आहेत मात्र आतापर्यंत एकंदर ६ माकडांचा उल्लेख  केला जातो. त्यात चौथे माकड शिजारू नावाचे असून  पाच आणि ६ क्रमांकाची माकडेही आहेत मात्र ती बनावट असल्याचे मानले जाते. तीन माकडांना संरक्षणाचे प्रतीक म्हणून घरांमध्ये, दुकानांमध्ये ठेवले जाते.  मिजारू, किकाजारू आणि इवाजारू या तीन माकडांनंतर येणारे शिजारू हे माकडे वाईट करू नये वाईट विचार करू नये, असे सांगणारे आहे.  ते आपल्या गुप्तांगावर हात ठेवून आहे. हा संदेश देणारे आहे. ही पाच माकडे तशी शहाणी आहेत. पाचवे माकड हे दोन्ही हातामध्ये भांडे पकडून आहे आणि ते आवश्यकतेपेक्षा जास्त खाऊ नका असे सांगणारे असावे. सहावे माकड मात्र नेमके काही मूर्त स्वरूपात दिसत नाही.

या पहिल्या तीन माकडाना जपानमधील शिंटो संप्रदायात मोठे मानाचे स्थान आहे. काहींच्या मते कन्फ्युशियस या तत्त्ववेत्त्याने या माकडांचा शोध लावला व आठव्या शतकात चीनहून जपानमध्ये ही माकडे पोहोचली. युनेस्कोनेही वर्ल्ड हेरिटेजमध्ये त्यांना स्थान दिले आहे.

आज भारतात गांधींच्या या माकडांची अवस्था मात्र नक्कीच बिकट झालेली आहे. आदर्शवत अशा विविध बाबींना धाब्यावर बसवण्याची कला भारतातील राजकारणात असलेल्या आणि नसलेल्यांनीही सादर केली आहे. त्यामुळेच या सध्याच्या दिवसांमध्ये माकडांनी उच्छाद मांडला आहे की माणसांनी ते मात्र तमाम भारतवासींनीच ठरवायचे आहे.


- रवींद्र यशवंत बिवलकर


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

फिर सुबह होगी .... पण कधी?

सुबह कभी तो आयेगी... हे गाणे आज नेहरूवादी नसलेल्या  व नेहरूंच्या राजवटीवर आसुड ओढणाऱ्या विचारसरणीच्या सत्ताधारी ‘भाजपवादी’ अशा १० वर्षांच्या...