शनिवार, २७ मे, २०२३

  सावरकर : कालआज आणि उद्या   

माझ्या नजरेतून - 

सनातन धर्म आणि सावरकर

सनातनी बंधूंची ती व्याख्या किती योग्य वा अयोग्य आहे हे दोघांच्याही स्पष्टपणे ध्यानात यावे म्हणून या वादग्रस्त प्रकरणातील ‘सनातन धर्म’ या दोन मुख्य शब्दांचा अर्थच प्रथम निश्चित करणे आवश्यक झालेले आहे.’ सावरकरांनी या लेखाची सुरुवातच सुधारक आणि सनातनी यांच्या परिभाषेतून स्पष्ट केली आहेती अशासाठी कीयातील नेमकेपण सांगत त्यांनी आपल्यादृष्टीने सनातन म्हणजे काय,  धर्म कोणत्या अर्थाने सनातन पदवीला योग्य वाटतो हे देखील त्यात त्यांनी स्पष्ट केले आहेयातच त्यांनी पोथिनिष्ठतेला विरोध करीत अनेक बाबी स्पष्ट केल्या आहेत.

स्वातंत्र्यवीर सावरकरांनी धर्माचा अर्थ वा व्याख्या त्यांच्या पद्धतीने आणि  नवीन कालाला धरून केलीहे करीत असताना त्यांनी सुधारकसनातन यातील भेद आणि त्यासंबंधातील समजाचेव्याख्येचे दोषही त्यांनी मांडले होतेतत्कालीन परिस्थितीत असणारी विचारसरणी आणि सामाजिक मानसिकता यासंबंधातील त्यांचे लिखाण पाहाता आजही ते अधिक चिकित्सक वाटते.

विज्ञाननिष्ठ निबंध’ या पुस्तकातील ‘खरा सनातन धर्म कोणता’ यामधील त्यांची ही चिकित्सा विचारात घेण्यासारखी आहेत्यावरून सुधारक आणि सनातन धर्म यामधील नेमकेपण त्यांनी अचूक मांडले आहे.

सुधारक कोण यावर सनातनी बाजूने व्याख्या केली आहे त्यानुसार ‘जो सनातन धर्माचा उच्छेद करू पाहतो तो’ सुधारकतसेच सनातन म्हणजे काय तर, ‘जीविरुद्ध ब्रही न काढता ती शिरसावंद्य मानणे हे धार्मिक कर्तव्य आहे अशी आज्ञा वा रूढी होयअसे समजण्याची सवय लागून गेलेली असल्यामुळे एखादी गोष्ट रूढी व्यवहारात अगदी ढळढळीतपणे हानिकारक होत आहे.   हे कळत असतानाही ती सनातन आहे इतके म्हणताच ती मोडण्याचे त्यांच्या जिवावर येते आणि ती मोडू पाहणारा सुधारक काहीतरी अपवित्रधर्माविरुद्ध अकर्म करू निघाला आहेअसा त्यांचा एक पूर्वग्रह सहजच होऊन बसतोलोकसमाजाचा हा पूर्वग्रह दूर करण्यासाठी आणि आमच्या सनातनी बंधूंची ती व्याख्या किती योग्य वा अयोग्य आहे हे दोघांच्याही स्पष्टपणे ध्यानात यावे म्हणून या वादग्रस्त प्रकरणातील ‘सनातन धर्म’ या दोन मुख्य शब्दांचा अर्थच प्रथम निश्चित करणे आवश्यक झालेले आहे.’ सावरकरांनी या लेखाची सुरुवातच सुधारक आणि सनातनी यांच्या परिभाषेतून स्पष्ट केली आहेती अशासाठी कीयातील नेमकेपण सांगत त्यांनी आपल्यादृष्टीने सनातन म्हणजे काय,  धर्म कोणत्या अर्थाने सनातन पदवीला योग्य वाटतो हे देखील त्यात त्यांनी स्पष्ट केले आहेयातच त्यांनी पोथिनिष्ठतेला विरोध करीत अनेक बाबी स्पष्ट केल्या आहेतकिंबहुना यामुळेच सावरकर अद्ययावत आणि विज्ञाननिष्ठ होतातआणि त्यांचा धर्म या विषयीची भूमिकाही अधिक स्पष्ट कळू शकतेअर्थात  विद्यमान काळात ती किती जणांनी सामाजिक वा राजकीय दृष्टीनेही स्वीकारलेली आहेते कोडेच आहे!  

ते म्हणतात कीश्रुतिस्मृतीपासून तो शनिमाहात्म्यापर्यंतच्या साऱ्या पोथ्या आणि वेदांच्या अपौरुषेयत्वापासून तो वांग्याच्या अभक्षत्वापर्यंतचे सारे सिद्धात सनातन धर्म या अंकाच पदवीस पोचलेले आहेतउपनिषदांतील परब्रह्म स्वरूपाचे अत्युदार विचार हेही सनातन धर्मच आणि विस्तवापुढे पाय धरून शेकू नयेकोवळ्या अन्हात बसू नयेलोखंडाचा विक्रय करणाऱ्याचे अन्न कदापि खाऊ नयेरोगचिकित्सक वैद्यभूषणाचे अन्न तर घावातील पुवाप्रमाणे असून सावकारी करणाऱ्या व्याजबट्टा घेणाऱ्या गृहस्थाचे अन्न विष्ठेप्रमाणे असल्यामुळे त्याच्या घरी वा सांगाती केव्हाही जेवू नये. (मनु-२२०); गोरसाचा खरवसतांदुळाची खीरवडेघारगे खाणे निषिद्ध असून लसूणकांदा आणि गाजर खाल्ल्याने तर द्विज तत्काल पतित होतो (पतेविजःमनु - १९); परंतु श्राद्धनिमित्त केलेले मांस जो कोणी हट्टाने खात नाही तो अभागी अकवीस जन्म पशुयोनि पावतो. (मनु-३५) 'नियुक्तस्तु यथान्यय यो मास नात्ति मानवः । सत्य पशुता याति संभवानेकविंशतिन!!’ हे सारे सनातन धर्मच.’

अशी उदाहरणे देत सावरकरांनी सनातन धर्माचे स्वरूप उघड केले आहेयामुळे त्यावर जोरदार ताशेरे ओढताना सावरकर लिहितात कीया अनेक प्रसंगी अगदी परस्परविरुद्ध असणाऱ्या विधिनिषेधांस आणि सिद्धान्तांस सनातन धर्म हाच शब्द लुगेसुंगे भाबडे लोकच लावतात असे नसून आपल्या साऱ्या स्मृतिपुराणांतील सनातन धर्मग्रंथांतूनच ही परंपरा पाडलेली आहेवरील प्रकारच्या साऱ्या मोठ्याधाकट्याव्यापकविक्षिप्तशतावधानीक्षणिक आचारविचारांच्या अनुष्टुपाच्या अंती अगदी ठसठशीतपणे ही एकच राजमुद्रा बहुधा ठोकून दिलेली असते कीएषा धर्मस्सनातनः!' 

रिवाजरितीभाती प्रचलित प्रथापरंपरा यावर खरे म्हणजे सावरकरांनी चांगलेच ताशेरे ओढले आहेतत्यांच्या सनातन या संकल्पनेची व्याख्या ही वेगळी होती आणि धर्म या शब्दाची व्याप्तीही वास्तव होतीमात्र ती आजही समजलेली नाहीहिंदु असो वा मुस्लीमख्रिश्चन यांनी अद्ययावत वा विज्ञानवादी दृष्टीपासून पळ काढत प्रथापोथीला कवटाळले आहेही स्थिती आजही कायमच आहेयालाच धर्म म्हणताना कोणी मुस्लीम तर कोणी हिंदु तर कोणी ख्रिश्चनही ठरवतोयामुळेच वास्तवाकडे पाठ करून भावनिक आणि पारंपरिकतेला धर्म मानण्याचा अट्टाहास आजही चालूच आहे.

(क्रमश:)

रवींद्र यशवंत बिवलकर 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

फिर सुबह होगी .... पण कधी?

सुबह कभी तो आयेगी... हे गाणे आज नेहरूवादी नसलेल्या  व नेहरूंच्या राजवटीवर आसुड ओढणाऱ्या विचारसरणीच्या सत्ताधारी ‘भाजपवादी’ अशा १० वर्षांच्या...