शुक्रवार, ३० जून, २०२३

   तत्वज्ञान सावरकरांचे - ११

सावरकरांची भूमिका राष्ट्रनिष्ठ मानवहितकारी बुद्धिवाद्याचीच

रत्नागिरीमधील त्यांचे वास्तव्य आणि तेथील कार्य हे सामाजिकस्तरावरील, राष्ट्रसुधारणेच्या स्तरावरील आणि भविष्यात देश कसा असावा, यासाठी मार्गदर्शक असणाऱ्या दीपस्तंभासारखे होते. त्यांनी प्रत्यक्ष त्याचे प्रयोग करून तेथे दाखवले होते. त्यामुळेच ते प्रयोग, त्यांचे ते मार्गदर्शन तेथेच थांबणे, इतकेच नव्हे तर ते स्वातंत्र्यानंतरही तेथे पूर्णविरामाने थांबणे गरजेचे नव्हते. ती त्यांची अव्याहत चालणारी बुद्धिवादी पायवाटेची सुरुवात होती. त्यानंतरही   ती काळाप्रमाणे अद्ययावत होणे वा ठेवणे हे पुढच्या पिढीचे काम हवे होते. कारण त्यांचे हिंदुत्त्व हे अद्ययावत असे होते. ते पोथिनिष्ठ नव्हते आणि नाही, असे त्यांचे ते पोथिनिष्ठ न राहिलेले तत्त्वज्ञान स्वीकारण्यासाठी बुद्धिवादी आणि काळाबरोबर चालणाऱ्यांचीच गरज अधिक आहे. आपण तसे आहोत का, याचा विचार खरे म्हणजे सावरकरांवर टीका करणाऱ्याप्रमाणेच सावरकरांचा अनुनय करीत आहोत, असे सांगणाऱ्यांनीही वेळोवेळी करायला हवा.


स्वातंत्र्यवीर सावरकर यांची विचारसरणी त्यांचे तत्त्वज्ञान म्हणून स्वीकारणे हे सोपे नाही, कारण त्यांच्या क्रांतिकारक अशा बुद्धिवादातून ते तत्त्वज्ञान तयार झाले आहे. त्यावेळचे सोडा आजही त्यांच्या बुद्धिवादाला स्वीकारून तसे कृतीत आणणे सोपे नाही. त्यांनी दाखवलेल्या मार्गावरून जाण्यासाठी त्यांनी त्या त्या सामाजिक स्तरावर जाऊन तसे कार्य प्रत्यक्ष केले आहे. त्यांचे कार्य हे दीपस्तंभाप्रमाणे होते, त्याचा अवलंब देशाने करायला हवा होता. पण तो झाला नाही. या आधीच्या लेखांमध्ये सावरकर हे नास्तिक होते आणि आस्तिकही होते असे म्हटले होते. त्याप्रमाणेच त्यांनी स्वीकारलेली बौद्धिक कार्यान्वयनाची प्रक्रिया रत्नागिरीच्या स्थानबद्धतेमधील वास्तव्यात त्यांनी कृतीत आणून दाखवलेली होती. त्यावर अलीकडच्या तथाकथित डाव्या विचारसरणीला अर्धवटपणे जोपासणाऱ्यांनी टीकाही केलेली आढळून आली पण त्यांच्या टीकेकडे फार लक्ष द्यावे असे वाटत नाही, कारण अलीकडच्या अशा अनेकांना मुळात बुद्धिवादाचा मार्गच गवसलेला नाही, तेथे अधिक न बोलणे चांगले.
रत्नागिरीमधील त्यांचे वास्तव्य आणि तेथील कार्य हे सामाजिकस्तरावरील, राष्ट्रसुधारणेच्या स्तरावरील आणि भविष्यात देश कसा असावा, यासाठी मार्गदर्शक असणाऱ्या दीपस्तंभासारखे होते. त्यांनी प्रत्यक्ष त्याचे प्रयोग करून तेथे दाखवले होते. त्यामुळेच ते प्रयोग, त्यांचे ते मार्गदर्शन तेथेच थांबणे, इतकेच नव्हे तर ते स्वातंत्र्यानंतरही तेथे पूर्णविरामाने थांबणे गरजेचे नव्हते. ती त्यांची अव्याहत चालणारी बुद्धिवादी पायवाटेची सुरुवात होती. त्यानंतरही   ती काळाप्रमाणे अद्ययावत होणे वा ठेवणे हे पुढच्या पिढीचे काम हवे होते. कारण त्यांचे हिंदुत्त्व हे अद्ययावत असे होते. ते पोथिनिष्ठ नव्हते आणि नाही, असे त्यांचे ते पोथिनिष्ठ न राहिलेले तत्त्वज्ञान स्वीकारण्यासाठी बुद्धिवादी आणि काळाबरोबर चालणाऱ्यांचीच गरज अधिक आहे. आपण तसे आहोत का, याचा विचार खरे म्हणजे सावरकरांवर टीका करणाऱ्याप्रमाणेच सावरकरांचा अनुनय करीत आहोत, असे सांगणाऱ्यांनीही वेळोवेळी करायला हवा. अद्ययावत राहा, वा राहाणे हेच सावरकरांचे मानवाला असणारे सांगणे होते.  त्यात कर्मकांडापेक्षा राष्ट्र, भूमिनिष्ठ धर्म, इतिहासातील चुकांना नव्हे तर घोडचुकांना पुन्हा होऊ नयेत म्हणून टाळा असे सांगणारे तंत्र आणि धर्मातील पोथिनिष्ठता संपवा असे संागत समाजाला अद्ययावत करणारे प्रतिपादन असणारे सावरकरांचे हिंदुत्त्व होते. ते संन्यासी, गोसावी, कर्मकांड करणारे भिक्षुकादींकाचे नव्हते तर विद्वत्तेवर आणि बुद्धिवादावर भर देणारे होते.
सावरकरांच्या हिंदुत्वाबद्दल, त्यांच्या सामाजिक-राजकीय आणि राष्ट्रीय विचारसरणीबद्दल तसेच साम्यवाद आणि वर्गहितांचा समन्वय साधण्याच्या, राष्ट्रहित आणि मानवहित पाहाण्याच्या दृष्टीबद्दल अधिक चर्चा होणे गरजेचे आहे. सावरकरांकडे गेल्या काही काळामध्ये केवळ राजकीय दृष्टीने, राजकीय स्वार्थाने पाहिले गेले त्याऐवजी त्यांच्याकडे त्यांचे विचार, तत्त्वज्ञान, सतत बदलण्याची अद्ययावत राहाण्याची त्यांची नजर आणि धर्माबद्दलचे, धर्मांबद्दलचे अचूक निदान लक्षात घेण्याची मीमांसा करणे अधिक संयुक्तिक वाटते. यासाठी सावरकरांच्या या दृष्टीबद्दल अधिक बारकाईने पाहावे लागेल. या विविध मुद्द्यांमध्ये असणारा दृष्टिकोन आणि त्यामागची कारणे ही शोधताना विविध घटनांशी, परिस्थितीशी आणि भविष्याशीही परस्परसंबंधही कसा होता याचा उहापोह होणे गरजेचे आहे. ते समजून घेतले की, सावरकरांची भूमिका ही केवळ राजकारण्याची, दिशादर्शकाची, हिंदुसंघटकाची, क्रांतिकारक समाजसुधारकाची, तत्त्वज्ञाची नव्हती तर ती व्यापक अशा राष्ट्रनिष्ठ मानवहितकारी बुद्धिवाद्याचीच होती, असे दिसून येईल.
(क्रमश:)
- शल्य बोचरे

(लेखातील चित्र सौजन्य - चित्रकार योगेंद्र पाटील, पाचोरा)

 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

फिर सुबह होगी .... पण कधी?

सुबह कभी तो आयेगी... हे गाणे आज नेहरूवादी नसलेल्या  व नेहरूंच्या राजवटीवर आसुड ओढणाऱ्या विचारसरणीच्या सत्ताधारी ‘भाजपवादी’ अशा १० वर्षांच्या...