शुक्रवार, १५ मार्च, २०२४

तर मग ‘नोटा’ चा उपयोग तरी काय ?

     आल्या निवडणुका      

लोकसभा निवडणुकांसाठी विविध पक्षांच्या उमेदवारांच्या याद्या प्रसिद्ध होऊ लागल्या. वगळणे, भरणे अशा करण्यांनी पक्षापक्षापक्षातील गट-तट यांचे राजकारणही सुरू झाले. काहींनी पक्षांतून अन्य पक्षांमध्ये प्रवेश करण्यासही सुरुवात केली. पण मुळात यातून जनतेच्या हाती काय लागले, काय लागणार आणि जनतेसाठी यातून काय फलश्रुती असेल, याचा विचार करता गेल्या अनेक निवडणुकांमधील निकालांतून मिळालेल्या निर्णयाने जनतेला राजकीय पक्षांनी चांगलेच वगळले आहे. केवळ मतदार म्हणून जनतेने यावे व आपले कर्तव्य पार पाडावे, अशा प्रामाणिक भावनेतून राजकीय पक्ष, त्यांचे नेते पाहात असतात, असा भ्रम आजही अनेक मतदारांच्या मनात आहे. मुळात सत्तेची, निवडणुकीची गणिते करण्याची पद्धत वेगळी असते, हे जनतेमधील काहींना कळूनही त्यांचा प्रामाणिकपणा कायम आहे. यामुळेच ‘नोटा’ नावाचा पर्याय देऊनही सर्वसामान्यांना मतदानयंत्रातून काही फायदा होऊ शकलेला नाही. कारण नोटाचे गणित केवळ नावापुरते ठेवण्यात आले आहे. उलट या नोटांमुळे अमूक इतके मतदार मतदान करण्यास इच्छुक नाहीत, त्यांना उपलब्ध उमेदवारांमधील कोणीही उमेदवार पसंत नाही, पटलेला नाही किंवा त्या उमेदवारांमधून कोणीही पात्र वाटत नाही, असे व त्याहूनही आणखी भिन्न मत करून ‘नोटा’ वापरण्याचा प्रघात सुरू झाला खरा. पण त्यातून निष्पन्न काय झाले. नोटाचे प्रमाण किती असावे की त्यामुळे मतदारसंघातील मतदारांच्या अधिक्यावरही काही परिणाम होऊन निर्णयासंबंधात महत्त्वाच्या नोंदी होऊ शकतात. मतदारांची संख्या, मतदान करणाऱ्यांची संख्या, उमदवारांना मिळालेल्या मतांच्या विगतवारीनुसार नोटांसाठी ज्यांनी मते दिली त्यांची संख्या जर या सर्व तपशीलांनुसार विशिष्ठ असेल तर त्याचा निर्णयावर परिणाम होऊ शकतो का, उभे राहाणाऱ्या भरमसाठ उमेदवार, पक्षाचे उमेदवार त्यांना मिळालेली मते व त्यांना मतदानाच्या प्रमाणात न मिळालेली मते व मतदारांच्या संख्येच्या तुलनेत न मिळालेली मते यामुळे काही विशिष्ट निर्णय अशा उमेदवार वा पक्षांचे उमेदवार यांच्या संबंधात होऊ शकतो का, किवा त्या अनुषंगाने अशी काही टक्केवारी निवडणूक आयोगाने ठरविलेली आहे का, हा प्रश्नही या नोटा मतांसंबंधात महत्त्वाच असू शकतो, हे निवडणूक आयोगाने लक्षात घ्यायला हवे. अन्यथा आयाराम गयाराम सारखे नोटाराम म्हणून असे मतदान गणले जायचे. केवळ एक निवडणूक निकालामधील नोटा मतांची नोंद दिसण्यापुरतीच ती दिसेल. त्यामुळे नोटा या संकल्पनेलाच काहीच महत्त्व उरणार नाही. जर अधिक मतदारांनी नोटाचा वापर केला तर त्यांची संख्या लक्षणीय असेल तर तेथे एखादा उमेदवार अधिक मते मिळाली म्हणून विजयी ठरणार का, हा ही प्रश्न उपस्थित होऊ शकतो. त्यासाठी काही निकष हवेत, असे आपले बोचरे शल्य....

- शल्य बोचरे

1 टिप्पणी:

फिर सुबह होगी .... पण कधी?

सुबह कभी तो आयेगी... हे गाणे आज नेहरूवादी नसलेल्या  व नेहरूंच्या राजवटीवर आसुड ओढणाऱ्या विचारसरणीच्या सत्ताधारी ‘भाजपवादी’ अशा १० वर्षांच्या...