सुबह कभी तो आयेगी... हे गाणे आज नेहरूवादी नसलेल्या व नेहरूंच्या राजवटीवर आसुड ओढणाऱ्या विचारसरणीच्या सत्ताधारी ‘भाजपवादी’ अशा १० वर्षांच्या काळातही त्याच परिस्थितीवर लागू पडणारे आहे, हेच साहिर लुधियानवी यांच्या गीतरचनेचे वैशिष्ट्य. तर, परिस्थिती जैसे थेच असल्याचे लक्षात घेता असलेले दुर्दैवच... म्हणावे; तसे म्हटले तर अजिबात चुकीचे ठरणार नाही. नवीन पिढीला या परिस्थितीची बोच लागावी यासाठीच या गाण्याची रचना मांडत आहे. त्यावर वेगळे काही भाष्य करण्याची खरे म्हणजे आवश्यकता नाही. साहिर लुधियानवी यांची लेखणी आजही तितकीच प्रभावी आणि भेदक आहे.
फिर सुबह होगी हा १९५८ मधील हिंदी चित्रपट. याचे कथानक, त्याची गाणी आजच्या समाज आणि विशेष करून भारतीय समाजाला लागू पडतील अशीच आहेत. काळाप्रमाणे काही बाबी जरी बदललेल्या असल्या तरी गाण्याचा गाभा गंभीर आहे, आजही चिंता करायला लावणारा आहे. साहिर लुधियानवी यांनी लिहिलेली ‘वो सुबह कभी तो आयेगी’ ही रचना आजच्या राजकीय, सामाजिक परिस्थितीलाही लागू पडणारी आहे. म्हटलं तर आशावाद आणि म्डटलं तर निराशावाद अशा उंबरठ्यावर असणाऱ्या या रचनेने अस्वस्थ करायला लावण्याची ताकद यात आहे. नेहरूंच्याविचारसरणीवर व तत्कालीन भारतीय स्थितीवर व्यंगात्मक फटकारे ओढणारे हे या चित्रपटातील गाणे आज नेहरूवादी नसलेल्या व नेहरूंच्या राजवटीवर आसुड ओढणाऱ्या विचारसरणीच्या सत्ताधारी ‘भाजपवादी’ अशा १० वर्षांच्या काळातही त्याच परिस्थितीवर लागू पडणारे आहे, हेच साहिर लुधियानवी य़ांच्या गीचरचनेचे वैशिष्ट्य. तर, परिस्थिती जैसे थेच असल्याचे लक्षात घेता असलेले दुर्दैवच... म्हणावे; तसे म्हटले तर अजिबात चुकीचे ठरणार नाही. नवीन पिढीला या परिस्थितीची बोच लागावी यासाठीच या गाण्याची रचना मांडत आहे. त्यावर वेगळे काही भाष्य करण्याची खरे म्हणजे आवश्यकता नाही. साहिर लुधियानवी यांची लेखणी आजही तितकीच प्रभावी आणि भेदक आहे.
या गाण्यासंबंधात विकीपीडियावर असलेल्या एका नोंदीमध्ये असलेली माहिती विलक्षण आहे. त्यानुसार असे म्हटले आहे की,
“भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी त्यांच्या भाषणांमध्ये अनेकदा त्यांचे मित्र आणि सहकारी अटलबिहारी वाजपेयी यांच्यासोबत हा चित्रपट पाहण्याबद्दल सांगितले आहे . अडवाणी आठवतात की माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना चित्रपट पाहण्याची खूप आवड होती. त्यांनी १९५८ मध्ये दिल्ली महानगरपालिका निवडणुकीत पराभव झाल्यानंतर ते आणि वाजपेयी थेट चित्रपट पाहण्यासाठी गेले होते असा एक प्रसंग सांगितला. अडवाणी म्हणतात की तो चित्रपट 'फिर सुभा होगी' निघाला . अडवाणी म्हणतात की वाजपेयी पंतप्रधान झाल्यानंतर त्यांनी पक्ष कार्यकर्त्यांना सांगितले की चित्रपटाचे शीर्षक भविष्यसूचक ठरले आहे आणि अखेर एक पहाट झाली.”
आता अडवाणी यांच्या भाष्यानुसारही असणारी परिस्थिती आजही पुन्हा एकगा नव्या सकाळची वाट पाहात आहे, असेच म्हणावे लागेल.
- रवींद्र यशवंत बिवलकर (शल्य बोचरे)
वो सुब्ह कभी तो आएगी - साहिर लुधियानवी
चित्रपट - फिर सुबह होगी (१९५८)
१
वो सुबह (सुब्ह) कभी तो आएगी
इन काली सदियों के सर से जब रात का आँचल ढलकेगा
जब दुख के बादल पिघलेंगे जब सुख का सागर छलकेगा
जब अम्बर झूम के नाचेगा जब धरती नग़्मे गाएगी
वो सुब्ह कभी तो आएगी
जिस सुब्ह की ख़ातिर जुग जुग से हम सब मर मर कर जीते हैं
जिस सुब्ह के अमृत की धुन में हम ज़हर के प्याले पीते हैं
इन भूकी प्यासी रूहों पर इक दिन तो करम फ़रमाएगी
वो सुब्ह कभी तो आएगी
माना कि अभी तेरे मेरे अरमानों की क़ीमत कुछ भी नहीं
मिट्टी का भी है कुछ मोल मगर इंसानों की क़ीमत कुछ भी नहीं
इंसानों की इज़्ज़त जब झूटे सिक्कों में न तौली जाएगी
वो सुब्ह कभी तो आएगी
दौलत के लिए जब औरत की इस्मत को न बेचा जाएगा
चाहत को न कुचला जाएगा ग़ैरत को न बेचा जाएगा
अपने काले करतूतों पर जब ये दुनिया शरमाएगी
वो सुब्ह कभी तो आएगी
बीतेंगे कभी तो दिन आख़िर ये भूक के और बेकारी के
टूटेंगे कभी तो बुत आख़िर दौलत की इजारा-दारी के
जब एक अनोखी दुनिया की बुनियाद उठाई जाएगी
वो सुब्ह कभी तो आएगी
मजबूर बुढ़ापा जब सूनी राहों की धूल न फाँकेगा
मासूम लड़कपन जब गंदी गलियों में भीक न माँगेगा
हक़ माँगने वालों को जिस दिन सूली न दिखाई जाएगी
वो सुब्ह कभी तो आएगी
फ़ाक़ों की चिताओं पर जिस दिन इंसाँ न जलाए जाएँगे
सीनों के दहकते दोज़ख़ में अरमाँ न जलाए जाएँगे
ये नरक से भी गंदी दुनिया जब स्वर्ग बनाई जाएगी
वो सुब्ह कभी तो आएगी
२
वो सुबह (सुब्ह) हमीं से आएगी
जब धरती करवट बदलेगी जब क़ैद से क़ैदी छूटेंगे
जब पाप घरौंदे फूटेंगे जब ज़ुल्म के बंधन टूटेंगे
उस सुब्ह को हम ही लाएँगे वो सुब्ह हमीं से आएगी
वो सुब्ह हमीं से आएगी
मनहूस समाजी ढाँचों में जब ज़ुल्म न पाले जाएँगे
जब हाथ न काटे जाएँगे जब सर न उछाले जाएँगे
जेलों के बिना जब दुनिया की सरकार चलाई जाएगी
वो सुब्ह हमीं से आएगी
संसार के सारे मेहनत-कश खेतों से मिलों से निकलेंगे
बे-घर बे-दर बे-बस इंसाँ तारीक बिलों से निकलेंगे
दुनिया अम्न और ख़ुश-हाली के फूलों से सजाई जाएगी
वो सुब्ह हमीं से आएगी








