मंगळवार, ३० मे, २०२३

  सावरकर : कालआज आणि उद्या   

माझ्या नजरेतून -१०

बुद्धिवादी चिकित्सक

अमूक ऐहिक आचाराने परलोकी अमुक उपयोग होतोअसे सांगणाऱ्या कोणत्याही नियमास आज तरी सनातन धर्म म्हणजे शाश्वत व अपरिवर्तनीय नि अबाधित नियम असे मुळीच म्हणता येणार नाहीया पारलौकिक प्रकरणी नाना क्लृप्ति सांगणारे कोणतेही धर्मग्रंथ अपौरुषेय वा ईश्वरदत्त नसून मनुष्यकृत वा मनुष्यस्फूर्त आहेतत्याच्या क्लृप्ति प्रमाणहीन असल्याने त्यास सनातन धर्मशाश्वत सत्य असे म्हणता येत नाही.

सावरकरांचा बुद्धिवाद हा वरवरचा नव्हताअंध नव्हतातो सखोलविचारपूर्वक होताचिकित्सक असणारा त्यांचा बुद्धिवाद हा विविधांगी विचार करीत मांडला जाणारा होतावैदिक तत्त्वज्ञानाचा सांगोपांग विचार करीत ते चिकित्सा करतातआप्तवाक्य आणि शब्दप्रमाण या संबंधातही त्यांनी तावून सुलाखून विचार केला आहेत्यामुळे काही वैदिक सिद्धांतांचे आधार घेतानाच ते कोणत्याही एका सिद्धांताला सत्य आहेअसे मानायला तयार नसतातत्यावरील चर्चेमधून ते पारलौकिक वा तत्संबंधत विषयावरील सिद्धांत स्वीकारायला तयार नसतात.  शब्दप्रामाण्याबद्दलही ते याच प्रकारची बाजू मांडतात.  पारलौकिक वा तत्त्वज्ञानविषयांचे सिद्धांतही शाश्वत कसे नाहीतहे यातून स्पष्ट होतेतसेच जगातील विविध धर्मांच्या संबंधातील त्यांचा वास्तववादी आणि तर्कबद्ध दृष्टिकोन दिसून येतोत्यांची ही खाली दिलेली विधाने म्हणजे सावरकरांच्या बुद्धिवादी भाष्याची प्रचिती देणारी आहेत.

।। शब्दप्रामाण्याची स्थिती आप्तवाक्यासारखीच आहेअपौरुषेय वेद ज्या कारणासाठी अपौरुषेय ठरलेत्याच कारणासाठी तौलिदइंजिलबायबलकुराणअवेस्तास्वर्णग्रंथ - एक ना दोनजगात जवळजवळ जे पन्नास एक ग्रंथ तरी आजही ईश्वरप्रदत्त म्हणून प्रख्यात आहेततेही सर्व अपौरुषेय मानणे भाग पडतेआणि त्या प्रत्येकात देवाने प्रत्येक तदितर अपौरुषेय धर्मग्रंथातील पारलौकिक वस्तुस्थितीच्या दिलेल्या माहितीशी विभिन्नविसंगत नि विरुद्ध माहिती दिलेली आहेवेद सांगतातस्वर्गाचा इंद्र हाच राजापण बायबलाच्या स्वर्गात इंद्राचा पत्ता टपालवाल्याला देखील माहीत नाहीदेवपुत्र येशूंच्या कंबरेस साऱ्या स्वर्गाची किल्ली ! देव आणि देवपुत्र दोघे एकच. Trinty in unity, unity in trinty ! कुराणातील स्वर्गात ला अल्ला इल्लला आणि महंमद रसुलल्लातिसरी गोष्ट नाहीरेडइंडियनांच्या स्वर्गात डुकरेच डुकरेघनदाट जंगलेपण मुस्लीम पुण्यवंतांच्या स्वर्गात असली 'नापाक चीजऔषधालाही सापडणार नाही ! आणि प्रत्येकाचे म्हणणे असे की स्वर्ग मी सांगतो तसाच आहेप्रत्यक्ष देवाने ते सांगितले आहेनव्हे महंमदादि पैगंबर तर वर जावूनराहून स्वतः ते पाहून परत आले नि त्यांनीही तेच सांगितलेतीच स्थिती नरकाची ! पुराणात मूर्तिपूजक नि याज्ञिकच काय पण यज्ञात मारलेले बोकड देखील स्वर्गातच जातातअसा त्याचा मेल्यानंतरचा पक्का पत्ता दिला आहेपण कुराण तर शपथेवर सांगते कीनरकातल्या जागा कितीही दाटी झाली तरी जर कोणाकरिता राखून ठेवल्या असतील तर त्या ह्या मूर्तिपूजक आणि अग्निपूजक सज्जनांसाठीच होतमेल्यानंतरचा पक्का पत्ता नरकहे सारे धर्मग्रंथ अपौरुषेय यास्तव खरे धरावे तरीही त्यात सांगितलेली वस्तुस्थिती शब्दप्रामाण्याने देखील सिद्धांतभूत ठरत नाहीअन्योन्यव्याद्यातातते सारे मनुष्यकल्पित खोटे मानले तर ती सिद्धांतभूत ठरत नाहीच नाही - वदतोव्याघातातआणि काही खोटे मानावे तर तरीही ते तसे नि हे असे कांहे ठरविण्यास त्यांच्या स्वतःच्या शब्दावाचून दुसरे प्रमाण नसल्या मुळे ती सिद्धांत ठरत नाही ती नाहीच - स्वतंत्र प्रमाणाभावात.

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या या तार्किक आणि परखड अशा युक्तिवादावर वास्तविक काही उत्तर वा सारवासारवही करता येण्यासारखी नाही इतकी ती टीका अचूकचपखल अशी मर्मभेदी आहेकोणाही एका धर्मग्रंथाबद्दल त्यांनी असा युक्तिवाद मांडलेला नाही तर तो सर्वच पौरुषेय अशा धर्मग्रंथांबद्दलच स्पष्टपणे मांडला आहेएकांगीपणा नाही तर तटस्थ आणि तारतम्यपूर्ण असा हा त्यांचा दावा भेदक आहेमार्क्सवादी म्हणवणाऱ्यांनाही त्यांनी अशा प्रकारच्या विचारांमधून नमवले आहेधर्माचे अस्तित्त्व ज्या धर्मग्रंथांवर अवलंबून ठेवून सांगितले जातेत्या धर्मग्रंथांबद्दलच त्यांनी इतके सत्यकथन करणारे विचार स्पष्ट केले आहेतयातच त्यांची विचारसरणी स्पष्ट होतेती कितींना झेपते ते त्यांचे त्यांनी ठरवावे मात्र सावरकरांवर जातीयतेचा शिक्का मूर्खपणाने मारण्याचे धाडस करू नये हे नक्की.

।। मनुष्याचे जे ऐहिक व्यवहार त्याच्या पारलौकिक जीवनास उपकारक आहेत असे समजले जाओत्यास आम्ही आचार हा शब्द योजतोअर्थात् वर दर्शविल्याप्रमाणे पारलौकिक जीवनासंबंधी आस्तिपक्षी वा नास्तिपक्षी अजून कोणताही नक्की सिद्धांत मनुष्यास कळलेला नसल्यामुळे त्याला कोणता ऐहिक आचार  उपकारक होईल हे ठरविणे अशक्य आहेहिंदूंच्याच नव्हे तर मुस्लीमख्रिश्चनपारशी यहुदी प्रभृति झाडून सान्या धर्म ग्रंथातील कर्मकांडाचा पाया अशा वाळूच्या ढिगावर उभारलेला आहे. 'क्षहे बेट की गांवरान की वैराणपूर्वेस की उत्तरेसआहेच की नाही हेच जिथे निश्चित केले नाहीतिथे 'क्षभूमध्ये सुखाने नांदता यावे म्हणून कोणत्या दिशेने जावे आणि कोणती शिधा-शिदोरी तिथे उपयोगी पडेलयावे बारीकसारीक अपरिवर्तनीय नियम बनविणे किती अनमानधपक्याचे कामतसेच हे यास्तव अमूक ऐहिक आचाराने परलोकी अमुक उपयोग होतोअसे सांगणाऱ्या कोणत्याही नियमास आज तरी सनातन धर्म म्हणजे शाश्वत व अपरिवर्तनीय नि अबाधित नियम असे मुळीच म्हणता येणार नाहीया पारलौकिक प्रकरणी नाना क्लृप्ति सांगणारे कोणतेही धर्मग्रंथ अपौरुषेय वा ईश्वरदत्त नसून मनुष्यकृत वा मनुष्यस्फूर्त आहेतत्याच्या क्लृप्ति प्रमाणहीन असल्याने त्यास सनातन धर्मशाश्वत सत्य असे म्हणता येत नाही.

 (क्रमश:)

रवींद्र यशवंत बिवलकर

सोमवार, २९ मे, २०२३

   सावरकर : कालआज आणि उद्या  

माझ्या नजरेतून -

धर्म... लौकिक आणि पारलौकिक 

हिंदुत्वाला न समजून घेता सावरकरांवर टीका करणाऱ्यांनाही विशेष करून डाव्या वा सावरकर विचारविरोधकांना त्यांचा बुद्धिवाद झेपला नाहीकदाचित त्यांच्या बुद्धीला ते स्वीकारावयाचे नव्हतेयाचे कारण हिंदु या शब्दाबद्दल असणारी या विरोधकांची वा डाव्यांची आडमुठी वा पूर्वग्रहदूषित वृत्तीही कारणीभूत ठरली आहे.  सावरकर यांच्या हिंदुत्वाबद्दलहिंदुअहिंदु व्याख्येबद्दल तसेच अन्य धर्मांच्या संबंधातील टिप्पणींबद्दल काही सांगण्याआधी त्यांच्या बुद्धिवादधर्माच्या लौकिक आणि पारलौकिक घटकांचा विचार पाहाण्यासारखा आहेत्यामुळे सावरकरी हिंदुत्व नेमके कळण्यासही सुलभ होऊ शकेलअसे वाटते.

धर्म लौकिक वा पारलौकिक अशा दोन्ही दृष्टीने स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी सूक्ष्मपणे विचार केला आहेतार्किक आणि तात्त्विक  दोन्ही पद्धतीने ते धर्म संकल्पनेचा विचार करतातमात्र हे सर्व करीत असताना त्यांचा निष्कर्ष ते ज्या पद्धतीने मांडताततो बुद्धिवादी आहेविज्ञानाचिकित्सेला मानणारा आहे आणि तर्कशास्त्रालाही धरून ते संयमितपणे आपले मत व्यक्त करतातकिंबहुना यामुळेच त्यांच्या मनातील धर्माच्या संकल्पनेबद्दल अनेक हिंदुत्ववाद्यांना ते स्वीकारण्याचे धाडस झाले नाहीते सावरकरांना आपल्याच मानसिकतेतून गृहित धरून पाहातात. त्यांनी सावरकरांना त्याच मानसिकतेमधून स्वीकारले, मानले आणि जाणलेतर हिंदुत्वाला न समजून घेता सावरकरांवर टीका करणाऱ्यांनाही विशेष करून डाव्या वा सावरकर विचारविरोधकांना त्यांचा बुद्धिवाद झेपला नाहीकदाचित त्यांच्या बुद्धीला ते स्वीकारावयाचे नव्हतेयाचे कारण हिंदु या शब्दाबद्दल असणारी या विरोधकांची वा डाव्यांची आडमुठी वा पूर्वग्रहदूषित वृत्तीही कारणीभूत ठरली आहे.  सावरकर यांच्या हिंदुत्वाबद्दलहिंदुअहिंदु व्याख्येबद्दल तसेच अन्य धर्मांच्या संबंधातील टिप्पणींबद्दल काही सांगण्याआधी त्यांच्या बुद्धिवादधर्माच्या लौकिक आणि पारलौकिक घटकांचा विचार पाहाण्यासारखा आहेत्यामुळे सावरकरी हिंदुत्व नेमके कळण्यासही सुलभ होऊ शकेलअसे वाटते.

सावरकरांचा बुद्धिवादी विचार आहेहे अनेकांना पटत नाहीकारण ते सावरकरांना हिंदु धर्माच्या जातीय गटामध्ये बसवतातत्यामुळे सावरकरांसारख्या विज्ञाननिष्ठभूमिनिष्ठ आणि राष्ट्रनिष्ठ हिंदुत्व मानणाऱ्याहिंदुत्व सांगणाऱ्या व्यक्तीने नेमके हिंदुत्व काय सांगितले आहेहेच अनेकजणांना उमजत नाही तर काही जाणीवपूर्व डोळेझांक करतातधर्म या संबंधात सावरकरांच्या तत्त्वज्ञानाचा लौकिक आणि पारलौकिक अशा दोन्ही अंगाने विचार करता त्यांच्या तार्किकतात्विक दृष्टिकोनातील सखोलसंयमित विचारधारणेची महत्तता कळून येतेआजही त्यांच्या काळाचा विचार करता ते यामुळेच अद्ययावत वाटतातफक्त तो अद्ययावतपणा पाहाण्याची आपल्यामध्ये बुद्धी हवीतशी नजर हवीतसा तटस्थपणाही हवा.

या अनुषंगाने सावरकरांची विधाने लक्षात घेण्यासारखी आहेत.

।। ईश्वरजीवजगत यांच्या स्वरुपाचे नि परस्परसंबंधांचे आस्तिरुप वा नास्तिरुप असे त्रिकालाबाधित नियम असलेच पाहिजेतत्याचप्रमाणे जन्ममृत्युपूर्वजन्मस्वर्गनरक याविषयीही जी कोणती वस्तुस्थिती असेल ती निश्चितपणे सांगणारे ज्ञानही त्रिकालाबाधित म्हणवून घेण्यास पात्र असणारचयास्तव या पारलौकिक प्रकरणीचे सिद्धांतही सनातन धर्म म्हणजे शाश्वतअपरिवर्तनीय धर्म होत यात शंका नाही.

।। निश्चित झालेल्या वैज्ञानिक नियमाप्रमाणे धर्मग्रंथातील हे पारलौकिक वस्तुस्थितीचे वर्णन प्रत्यक्षनिष्ठ प्रयोगाच्या कसोटीस मुळीच उतरत नाहीतसारी भिस्त बोलून चालून एका शब्दप्रामाण्यावरआप्तवाक्यावरविशिष्ट आंतरअनुभूतीवर अवलंबून असते.

।।  काही मर्यादेपर्यंत प्रत्यक्षानुमानिक प्रमाणास अविरुद्ध असणारे शब्दप्रमाण व आप्तवाक्य हेही एक प्रमाण आहेच आहे.

 (क्रमश:)

रवींद्र यशवंत बिवलकर

रविवार, २८ मे, २०२३

  सावरकर : कालआज आणि उद्या   

माझ्या नजरेतून -

चित्र- चित्रकार योगेंद्र पाटील, पाचोरा

झुंड धर्मांच्या झुंजीतच लुप्त 

प्रकाशउष्णतागतीगणितगणितज्योतिषध्वनीविद्युत चुंबकरेडियमभूगर्भशरीरवैद्यकयंत्रशिल्पवानस्पत्य जैवआणि तत्सम जी प्रयोगक्षम शास्त्रे (सायन्सेसआहेत त्याचे जे प्रत्यक्षनिष्ठ आणि प्रयोगसिद्ध नियम आज मनुष्यजातीस ज्ञात झालेले आहेत तोच आमचा खरा सनातन धर्म होयते नियम आर्यांसाठीमुस्लिमांसाठी वा काफरांसाठीइस्रायलींसाठी वा हीदनांसाठी अवतीर्ण झालेले नसून ते स र्व मनुष्यमात्रास नि:पक्षपाती समानतेने लागू आहेतहा खरा सनातन धर्म आहेइतकेच नव्हेतर हा खरोखर मानवधर्म आहेहा केवळ 'कृते तु मानवो धर्मः’ नाहीतर त्रिकालाबाधित मानवधर्म आहेम्हणूनच त्यास सनातन हे विशेषण निर्विवादपणे लागू पडते.’

सावरकरांची धर्मासंबंधातील चिकित्सा अतिशय वास्तववादी आहेकिंबहुना नव्या कालाच्या दिशेने जगात होणाऱ्या बदलाची चाहुलच त्यांना लागलेली होतीत्यामुळे नजीकच्या काळात नागरी संस्कृतीचा होणारा कायापालट त्यांना स्वातंत्र्यापूर्वी बराच काळ आधी बौद्धिक स्तरावर पाहाता आलामात्र आजही त्यांच्या त्या स्तरापर्यंत आम्ही जाऊ शकलो नाहीतत्यामुळेच भारतात फाळणीनंतरही ना मुस्लीम बदलू शकले ना हिंदूना स्थैर्य मिळू शकलेप्रत्येकाची झुंड धर्मांच्या झुंजीतच लुप्त होत असल्याचे अतिशय विदारक सत्य आज पाहावे लागत आहे.

सनातन आणि धर्म याचे अतिशय सूक्ष्म विवेचन सावरकरांनी केले आहेत्यामुळे सनातन धर्म ही एकच पदवी सरसकट पद्धतीने देताना मानवी बुद्धीच चुकली असल्याचे ते सांगतातत्यामुळे रुढ अर्थच या संबंधातील विसंवादाला कारण आहे.

सावरकर म्हणतात त्यानुसार ‘सनातन शब्दाचा मुख्य अर्थ शाश्वतअबाधितअखंडनीयअपरिवर्तनीय धर्महा शब्दइंग्रजी ‘लॉ’ या शब्दाप्रमाणेच आणि तसाच मानसिक प्रक्रियेमुळे पुष्कळ अर्थांतरे घेत आला आहे.

 प्रथम त्याचा मूळचा व्यापक अर्थ नियमकोणत्याही वस्तूच्या अस्तित्वाचे नि व्यवहाराचे जो धारणनियमन करतो तो त्या वस्तूचा धर्मसृष्टीचे धर्मपाण्याचे धर्मअग्नीचे धर्म प्रभृती त्यांचे अपयोग या व्यापक अर्थीच होतात.  याच व्यापक अर्थामुळे पारलौकिक आणि पारमार्थिक पदार्थाच्या नियमांसही धर्मच म्हणण्यात येऊ लागलेमग ते नियम प्रत्यक्षागत असोत वा तसे भासोत!

स्वर्गनरकपूर्वजन्मइश्वरजीवजगत यांचे परस्परसंबंधया साऱ्यांचा समावेश धर्म या शब्दातच केला गेलाइतकेच नव्हे तर हळूहळू तो धर्म शब्द या त्याच्या पारलौकिक विभागार्थीच विशेषेकरून राखून ठेवल्यासारखा झालाआज धर्म शब्दाचा विशेष अर्थ असा हाच होतोकीया अर्थी धर्म म्हणजे 'रिलिजन.'

यावर सावरकर थांबत नाहीतते त्यापुढे जाऊन धर्म या शब्दाचे अधिक विश्लेषण करतातत्यामुळे ते सांगतात की, ‘मनुष्याचे जे ऐहिक व्यवहार वरील पारलौकिक जगतात त्यास अपकारक ठरतीलसे वाटलेत्या पारलौकिक जीवनात त्याचे धारण करतील असे भासलेतेही धर्मच मानण्यात आलेइंग्लीशमध्ये मोसेसअब्राहाममहंमद प्रभृती पैगंबरांच्या स्मृतीतही अशाच खच्चून असलेल्या साऱ्या कर्मकांडास 'लॉ'च म्हटले आहेया अर्थी धर्म म्हणजे आचार.   शेवटी वरील आचार वगळून मनुष्यामनुष्यांतील जे केवळ ओहिक प्रकरणीचे व्यवहार असतात त्या व्यक्तीच्या वा राष्ट्राच्या वर्तननियमांसही पूर्वी धर्मच म्हणतस्मृतीत युद्धनीतीराजधर्मव्यवहारधर्म प्रभृती प्रकरणांतून हे गोवलेले असतातपण आज यांपैकी पुष्कळसा भाग स्मृतिनिष्ठ अपरिवर्तनीय धर्मसत्तेतून निघून आपल्या इकडेही परिवर्तनीय मनुष्यकृत नियमांच्या कक्षेत शास्त्रीपंडितांनाही निषिद्ध न वाटावा इतक्या निर्विवादपणे समाविष्ट झालेला आहेजसे गाडी हाकण्याचे निर्बंधशिवीगाळचोरीइत्यादिकांचे दंडविधान तो निर्बंधशासनाचा ( कायदेशासनाचाप्रदेश होयआपल्या अलीकडे धर्म शब्द आज जसा 'रिलिजनया विशेषार्थी राखीव झाला आहेतसाच इंग्लीशमध्ये 'लॉहा शब्द विशेषार्थी या निर्बंध शासनास आज वाहिला जात आहेया प्रकरणी धर्म म्हणजे निर्बंध (कायदा 'लॉ').’

 सनातन आणि धर्म या शब्दांच्या अर्थाची निष्पत्ती सावरकरांनी विस्तृतपणे केली आहेत्यांनी सनातन म्हणजे काय हे सांगताना स्वमत परखडपणे व्यक्त केले आहेते सांगतात की, ' याचा अर्थ म्हणजे   नियमअपरिवर्तनीयजे बदलू नयेत इतकेच नव्हेतर जे बदलणे मनुष्याच्या शक्तीच्या बाहेरची गोष्ट आहे असे अबाधित जे धर्म असतीलनियम असतीलत्यासच सनातन धर्म ही पदवी यथार्थपणे देता येईलइतकेच नव्हे तर सावरकर म्हणतात की, ‘ मनुष्याच्या ज्ञानाच्या आटोक्यात जे जे सृष्टिनियम आणि जी जी वैज्ञानिक सत्ये आज आलेली आहेत त्यांसत्यांसच आम्ही आमचा सनातन धर्म समजतोनिःशेष परिगमनास्तव नव्हेतर दिग्दर्शनार्थ म्हणून खालील नामोल्लेख पुरे आहेत. '

प्रकाशउष्णतागतीगणितगणितज्योतिषध्वनीविद्युत चुंबकरेडियमभूगर्भशरीरवैद्यकयंत्रशिल्पवानस्पत्य जैवआणि तत्सम जी प्रयोगक्षम शास्त्रे (सायन्सेसआहेत त्याचे जे प्रत्यक्षनिष्ठ आणि प्रयोगसिद्ध नियम आज मनुष्यजातीस ज्ञात झालेले आहेत तोच आमचा खरा सनातन धर्म होयते नियम आर्यांसाठीमुस्लिमांसाठी वा काफरांसाठीइस्रायलींसाठी वा हीदनांसाठी अवतीर्ण झालेले नसून ते सर्व मनुष्यमात्रास नि:पक्षपाती समानतेने लागू आहेतहा खरा सनातन धर्म आहेइतकेच नव्हेतर हा खरोखर मानवधर्म आहेहा केवळ 'कृते तु मानवो धर्मः’ नाहीतर त्रिकालाबाधित मानवधर्म आहेम्हणूनच त्यास सनातन हे विशेषण निर्विवादपणे लागू पडते.’

सावरकरांच्या या चिकित्सेतून धर्म आणि विशेष करून सनातन धर्म याचे विवेचन करीत मिळालेली दिशा ही सावरकरांच्या तार्किक आणि बुद्धिवादी भूमिकेला स्पष्ट करतेहिंदुअहिंदु याची व्याख्या करताना सावरकरांनी यामुळेच भारताच्या वा हिंदुस्थानाच्या स्थानमहतीची मांडलेली संकल्पना ही यामुळेच अधिक तर्कशुद्ध आणि चपखल वाटतेकारण हिंदुत्व ही संकल्पना याच धर्माच्या अनुषंगाने मांडली आहे आणि त्यामागे असणारे सावरकरांचे दृष्टिकोन हे अधिक तार्किक आणि राष्ट्रनिष्ठ ठरतातमानवी समाजधर्म याची संकल्पना त्यांना अतिशय बारकाईने समजलेली वाटतेत्यामुळेच त्यांनी धर्म या संकल्पनेला हिंदुंसाठी भूमिनिष्ठ आणि विज्ञाननिष्ठ बनवले आहेयामधूनच त्यांनी समाजसुधारणा करण्यासाठी रत्नागिरीत असताना स्थानबद्धतेच्या काळात जे कार्य आरंभिले ते हिंदुंसाठी दिशादर्शक होतेइतकेच नव्हे तर त्यावेळी लिहिलेल्या हिंदुत्व पुस्तकातूनही त्यांनी केलेले दिग्दर्शन स्पष्ट होतेहे सारे करीत असताना त्यांनी हिंदुधर्माने पूर्वापार टाकलेल्या सात बेड्यांना वा शृंखलांना तोडले ही बाबही त्याकाळातील अतिशय महत्त्वाची घटना होतीत्याचे महत्त्व खरे म्हणजे हिंदु धर्मातील सनातन्यांनीही समजून घ्यायला हवे होतेअनेकदा अशा प्रकारच्या वर्तनातून केवळ ठरावीक उद्दिष्ट साध्य होत असते असे नाही तर त्यातून नव्याने पाऊल टाकण्यास सुरूवात झालेली असतेजुन्या जुनाट आणि कालबाह्य होऊ शकणाऱ्या संकल्पनांना आणि रिवाजांना समजून त्या कालाप्रमाणे बाद करण्याचाही संकेत या त्यांच्या सात बेड्या तोडण्याच्या कृतीमुळे झाला होतामात्र तो हिंदुंनी आजही समजून घेतलेला नाहीआजही अशा अनेक प्रकारच्या शृंखला तोडण्याची गरज आहेमात्र हे करताना प्रत्येकजण ज्ञानेश्वर होणे गरजेचे आहे पण दुसऱ्याच्या घरात... अशा भूमिकेत असल्याने अशा या हिंदु समाजाला पुन्हा मनुवादी धर्माला चिकटण्याची वृत्ती गेल्या काही वर्षांमध्ये तयार झालीत्याला कारणे अनेक आहेतपरंतु आजही त्यामुळे  पुन्हा कोणी  सावरकर निर्माण होईल कायाची वाट पाहात बसल्यासारखे हिंदु बसून आहेतहे दुर्दैव आहेवास्तविक व्यक्तिवाद अतिशय तरलतेने समजलेल्या सावरकरांनी समाजासाठी जुन्या परंपरांही दुसऱ्या व्यक्ती करीत असतील तर ते स्वीकारले होतेत्यांनी त्यांच्या व्यक्तीस्वातंत्र्यामध्ये अडथळा आणला नव्हताही भूमिका अतिशय समंजस असूनही आणि प्रत्येक मानवाला त्याचा तो व्यक्तिस्वातंत्र्याचा अधिकार असतोहे स्वीकारण्याची परिपक्वता त्यांच्यामध्ये होतीत्यामुळे खरे म्हणजे साक्षर होत असलेल्या हिंदु समाजाने भूमिनिष्ठ हिंदुत्व स्वीकारतानाच बुद्धिवादी हिंदुत्वही स्वीकारण्याकडे कल तरी दाखवावयास हवा होतामात्र तसे न होताफाळणीपूर्वीच्या आणि फाळणीनंतरच्या भारतीय स्वातंत्र्यामध्ये झालेल्या विविध राजकीय घडामोडींमधून स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी जो हिंदु संकल्पिला होतात्या हिंदु समाजाला मात्र व्यक्तिवादाची विज्ञानिष्ठ बौद्धिक उंची काही गाठता आली नाहीसंघटनात्मक कार्यामध्ये या उंची ऐवजी मनुवादी दृष्टीला महत्त्व दिले गेल्याने आज हिंदु मतांचे ध्रुवीकरण राजकीय स्तरावर झाले असले तरी सामाजिक आणि समाजबौद्धिक स्तरावर हिंदुनेसचे ध्रुवीकरण झाले नाहीविज्ञानाची फळे ऐहिकदृष्टीने हिंदु चाखत असले तरी त्या विज्ञानाच्या कसोटीवर धार्मिक प्रथा-परंपरा,संस्कृती ही अद्ययावत काळातील विज्ञानयुगातही पारखली जाणे नक्कीच गरजेचे आहे.

या सर्व पार्श्वभूमीवर देश म्हणून विवेचन करताना मुस्लीम वा अहिंदु समाजासाठीही स्वतंत्र भारतात वा हिंदुराष्ट्रात काय स्थान असेल ते सांगताना त्यांनी मांडलेली भूमिकाही तितकीच सुस्पष्ट होती ...

(क्रमश:)

- रवींद्र यशवंत बिवलकर

शनिवार, २७ मे, २०२३

चित्र- चित्रकार योगेंद्र पाटील, पाचोरा
  सावरकर : कालआज आणि उद्या  

माझ्या नजरेतून -

पोथिनिष्ठतेवर प्रहार

स्वातंत्र्यवीर सावरकरांची ही चिकित्सा वा विश्लेषण नीटपणे ध्यानात घेतली तर चालत्या काळाप्रमाणे वागावेराहावे आणि त्यामुळेच अद्ययावत राहावे हे सांगण्यावर त्यांनी भर दिला आहेहे करताना  धर्म म्हणजे काय, याचीही चिकित्सा केली आहेती अनेकांना पेलवण्यासारखी नाहीकिंबहुना हिंदुत्व हा सावरकरांचा शब्द केवळ घेतला गेला आहे पण त्यामागील संकल्पनेला बाजूला सारले गेले आहे. प्रथारिवाज पाळणे म्हणजे धर्म नव्हेत्या त्या काळात त्या त्या रिवाजाला का स्वीकारले गेले याची मीमांसा त्या त्या काळात केली गेली होतीअसेलही पण या काळात ते स्वीकारताना त्या प्रथारिवाजाला विज्ञानाच्या परीक्षानळीत घालून तावून सुलाखून घेण्याचा सावरकरांचा भर महत्त्वाचा आहेनेमका तोच आपण विसरलो आहोत


सावरकरांची धर्मासंबंधातील विशेष करून रितीरिवाजप्रथा वा सनातन धर्मातील श्रुतिस्मृतिपुराणोक्त यासंबंधातून केल्या जाणाऱ्या वर्तनासंबंधातील टीका आजही राणोक्त यासंबंधातून केल्या जाणाऱ्या वर्तनासंबंधातील टीका आजही  हिंदु धर्म मानणाऱ्या कथित हिंदुत्ववाद्यांना लागू होत आहेअर्थात आम्ही नाही बा त्यातले असे म्हणत सावरकरांना मान देत तोंडदेखल्या सावरकरप्रेमी आहोत म्हणणाऱ्यांची संख्याही कमी नाहीयाचे कारण सावरकरांचे हे विचार आणि त्या आधारे त्यांनी मांडलेले हिंदुत्व हे कितीजण स्वीकारण्याच्या तरी प्राथमिक स्थितीत आहेतते त्यांचे त्यांनी अभ्यासावेम्हणजे त्यांना नेमकेपण कळेल.  

धर्मरिती-रिवाजरुढी परंपरा यांची झालेली गल्लत आणि त्यातून धर्म आपला किती जुना आहेकिती शास्त्राधारित वा विज्ञानाधारित आहेअसे मानणारे लोक जगात भरपूर आहेतकिंबहुना पोथिनिष्ठतेमुळे डोळे मिटून धर्म जागणऱ्यांना उठवण्याचा प्रयत्न सावरकरांनी केला तो केवळ हिंदुंपुरताच नव्हे तर अगदी जागतिक स्तरावरील धर्मांची उदाहरणेही सावरकरांनी यात दिलीत्यामुळेच त्यांनी ते स्पष्ट केले आहे.  

ते म्हणतात की, ‘आपल्या धर्मग्रंथातच ही अशी खिचडी झालेली नसून जगातील अितर झाडून साऱ्या अपौरुषेय म्हणविणाऱ्या प्राचीन आणि अर्वाचीन धर्मग्रंथांचीही तीच स्थिती आहेहजारो वर्षांपूर्वीच्या मोसेस पैगंबरापासून तो अगदी आजकालच्या अमेरिकेतील मोर्मन पैगंबरापर्यंत सर्वांनीमनुष्याच्या अठण्याबसण्यापासून दाढी-मिशा शेंडीच्या लांबीरुंदीपासून,  वारसांच्यादत्तकांच्या लग्नाच्या निर्बंधापासून तो देवाच्या स्वरूपापर्यंत आपल्या साऱ्या विधानांवर 'एष धर्मस्सनातनःहीच राजमुद्रा आणि तीही देवाच्या  नावाने ठोकलेली आहेहे सारे विधीनिषेध देवाने साऱ्या मानवांसाठी अपरिवर्तनीय धर्म म्हणून सांगितले आहेतसर्व मानवांनी सुंता केलीच पाहिजे हाही सनातन धर्म आणि त्रैवर्णिकांनी तसे भलतेसलते काहीएक न करता मुंजच करावी हाही सनातन धर्मचलाक्षणिक अर्थीच नव्हे तर अक्षरशः या साऱ्या अपौरुषेयइश्वरी धर्मग्रंथात एकाचे तोंड पूर्वेस तर एकाचे पश्चिमेस वळलेले आहेआणि तेही अगदी प्रार्थनेच्या पहिल्या पावलीचसकाळीच पूर्वेकडे तोंड करून प्रार्थना करणे हाही सनातन धर्म आणि सकाळी देखील प्रार्थना म्हटली की ती पश्चिमेकडेच तोंड करून केली पाहिजे हाही मनुष्यमात्राचा सनातन धर्मच ! एकाच देवाने मनूला ती पहिली आज्ञा दिली नि महंमदाला ही दुसरी दिलीदेवाची अगाध लीलादुसरे काय!’ 

हिंदुमुसलमानांचे दंगे करवून आपण अंग राखून दुरून मौज पाहात बसण्याचा आरोप शौकतअल्लीवर उगीच करण्यात येतोहा खेळ चालू करण्याचा पहिला मान त्यांचा नसून असे अगदी परस्परविरुद्ध प्रकार अपरिवर्तनीय सनातन धर्म म्हणून त्या दोघांसही सांगून त्याची झुंज लावून देणाऱ्या गमती स्वभावाच्या देवाचाच तो मान आहेही मूळची त्याची लीलाआणि त्याची नसेल तर त्याच्या नावावर हे ग्रंथ चापून लादून देणाऱ्या मनुष्याच्या मूर्ख श्रद्धेची!’ 

स्वातंत्र्यवीर सावरकरांची ही चिकित्सा वा विश्लेषण नीटपणे ध्यानात घेतले तर चालत्या काळाप्रमाणे वागावेराहावे आणि त्यामुळेच अद्ययावत राहावे हे सांगण्यावर त्यांनी भर दिला आहेहे करताना  धर्म म्हणजे काय याचीही चिकित्सा केली आहेती अनेकांना पेलवण्यासारखी नाहीकिंबहुना हिंदुत्व हा सावरकरांचा शब्द केवळ घेतला गेला आहेत्यामागील संकल्पनेला बाजूला सारले गेले आहेप्रथारिवाज पाळणे म्हणजे धर्म नव्हेत्या त्या काळात त्या त्या रिवाजला का स्वीकारले गेले याची मीमांसा त्या त्या काळात केली गेली होती. केली असेलही पण या काळात ते स्वीकारताना त्या प्रथारिवाजाला विज्ञानाच्या परीक्षानळीत घालून तावून सुलाखून घेण्याचा सावरकरांचा भर महत्त्वाचा आहेनेमका तोच आपण विसरलो आहोतकाही महाभागांनी समाजाच्या या प्रवाहाला बदलण्याऐवजी या काळात विज्ञानाधारे चिकित्सा न करता त्या प्रथाच कशा विज्ञानावर आधारित आहेतआजही त्या कशा अचूक आहेतहे सांगण्याचा आणि जगाला आपण विश्वगुरू कसे आहोत हे दाखविण्याचा अट्टाहास चालवला आहेमुळात पेटंट मिळवायचेही असेल तरी ते कालाच्या परीक्षेनुसारच मिळवावे लागते.  परंतु सामाजिक आणि धार्मिक समस्यांचा पाढा वाचत हिदुंचे ऐक्य साधण्याच्या वा ध्रुवीकरणाच्या नावाखाली भूमिनिष्ठ आणि विज्ञानिष्ठ चाचण्यांना मात्र बगल देताना हिंदुनेसहिंदुपण घालवून हिंदुइझमच जोपासून त्याला हिंदुत्व म्हणण्याचा आभास मात्र निर्माण केला गेला आहेयामुळेच सावरकरांच्या  हिंदुत्वाच्या तत्त्वज्ञानाला खरेच जोपासले गेले आहे कायाचे चिंतन-पुनरावलोकन करण्याची गरज आहेपोथिनिष्ठतेच्या कुप्रथेला जेव्हा पूर्णपणे जाणून बाजूला केले जाईलतेव्हाच सावरकरांना अभिप्रेत असणारा अद्यतनी वा अद्ययावत समाज प्रवाही होऊ शकेल.

(क्रमश:)

रवींद्र यशवंत बिवलकर

  सावरकर : कालआज आणि उद्या   

माझ्या नजरेतून - 

सनातन धर्म आणि सावरकर

सनातनी बंधूंची ती व्याख्या किती योग्य वा अयोग्य आहे हे दोघांच्याही स्पष्टपणे ध्यानात यावे म्हणून या वादग्रस्त प्रकरणातील ‘सनातन धर्म’ या दोन मुख्य शब्दांचा अर्थच प्रथम निश्चित करणे आवश्यक झालेले आहे.’ सावरकरांनी या लेखाची सुरुवातच सुधारक आणि सनातनी यांच्या परिभाषेतून स्पष्ट केली आहेती अशासाठी कीयातील नेमकेपण सांगत त्यांनी आपल्यादृष्टीने सनातन म्हणजे काय,  धर्म कोणत्या अर्थाने सनातन पदवीला योग्य वाटतो हे देखील त्यात त्यांनी स्पष्ट केले आहेयातच त्यांनी पोथिनिष्ठतेला विरोध करीत अनेक बाबी स्पष्ट केल्या आहेत.

स्वातंत्र्यवीर सावरकरांनी धर्माचा अर्थ वा व्याख्या त्यांच्या पद्धतीने आणि  नवीन कालाला धरून केलीहे करीत असताना त्यांनी सुधारकसनातन यातील भेद आणि त्यासंबंधातील समजाचेव्याख्येचे दोषही त्यांनी मांडले होतेतत्कालीन परिस्थितीत असणारी विचारसरणी आणि सामाजिक मानसिकता यासंबंधातील त्यांचे लिखाण पाहाता आजही ते अधिक चिकित्सक वाटते.

विज्ञाननिष्ठ निबंध’ या पुस्तकातील ‘खरा सनातन धर्म कोणता’ यामधील त्यांची ही चिकित्सा विचारात घेण्यासारखी आहेत्यावरून सुधारक आणि सनातन धर्म यामधील नेमकेपण त्यांनी अचूक मांडले आहे.

सुधारक कोण यावर सनातनी बाजूने व्याख्या केली आहे त्यानुसार ‘जो सनातन धर्माचा उच्छेद करू पाहतो तो’ सुधारकतसेच सनातन म्हणजे काय तर, ‘जीविरुद्ध ब्रही न काढता ती शिरसावंद्य मानणे हे धार्मिक कर्तव्य आहे अशी आज्ञा वा रूढी होयअसे समजण्याची सवय लागून गेलेली असल्यामुळे एखादी गोष्ट रूढी व्यवहारात अगदी ढळढळीतपणे हानिकारक होत आहे.   हे कळत असतानाही ती सनातन आहे इतके म्हणताच ती मोडण्याचे त्यांच्या जिवावर येते आणि ती मोडू पाहणारा सुधारक काहीतरी अपवित्रधर्माविरुद्ध अकर्म करू निघाला आहेअसा त्यांचा एक पूर्वग्रह सहजच होऊन बसतोलोकसमाजाचा हा पूर्वग्रह दूर करण्यासाठी आणि आमच्या सनातनी बंधूंची ती व्याख्या किती योग्य वा अयोग्य आहे हे दोघांच्याही स्पष्टपणे ध्यानात यावे म्हणून या वादग्रस्त प्रकरणातील ‘सनातन धर्म’ या दोन मुख्य शब्दांचा अर्थच प्रथम निश्चित करणे आवश्यक झालेले आहे.’ सावरकरांनी या लेखाची सुरुवातच सुधारक आणि सनातनी यांच्या परिभाषेतून स्पष्ट केली आहेती अशासाठी कीयातील नेमकेपण सांगत त्यांनी आपल्यादृष्टीने सनातन म्हणजे काय,  धर्म कोणत्या अर्थाने सनातन पदवीला योग्य वाटतो हे देखील त्यात त्यांनी स्पष्ट केले आहेयातच त्यांनी पोथिनिष्ठतेला विरोध करीत अनेक बाबी स्पष्ट केल्या आहेतकिंबहुना यामुळेच सावरकर अद्ययावत आणि विज्ञाननिष्ठ होतातआणि त्यांचा धर्म या विषयीची भूमिकाही अधिक स्पष्ट कळू शकतेअर्थात  विद्यमान काळात ती किती जणांनी सामाजिक वा राजकीय दृष्टीनेही स्वीकारलेली आहेते कोडेच आहे!  

ते म्हणतात कीश्रुतिस्मृतीपासून तो शनिमाहात्म्यापर्यंतच्या साऱ्या पोथ्या आणि वेदांच्या अपौरुषेयत्वापासून तो वांग्याच्या अभक्षत्वापर्यंतचे सारे सिद्धात सनातन धर्म या अंकाच पदवीस पोचलेले आहेतउपनिषदांतील परब्रह्म स्वरूपाचे अत्युदार विचार हेही सनातन धर्मच आणि विस्तवापुढे पाय धरून शेकू नयेकोवळ्या अन्हात बसू नयेलोखंडाचा विक्रय करणाऱ्याचे अन्न कदापि खाऊ नयेरोगचिकित्सक वैद्यभूषणाचे अन्न तर घावातील पुवाप्रमाणे असून सावकारी करणाऱ्या व्याजबट्टा घेणाऱ्या गृहस्थाचे अन्न विष्ठेप्रमाणे असल्यामुळे त्याच्या घरी वा सांगाती केव्हाही जेवू नये. (मनु-२२०); गोरसाचा खरवसतांदुळाची खीरवडेघारगे खाणे निषिद्ध असून लसूणकांदा आणि गाजर खाल्ल्याने तर द्विज तत्काल पतित होतो (पतेविजःमनु - १९); परंतु श्राद्धनिमित्त केलेले मांस जो कोणी हट्टाने खात नाही तो अभागी अकवीस जन्म पशुयोनि पावतो. (मनु-३५) 'नियुक्तस्तु यथान्यय यो मास नात्ति मानवः । सत्य पशुता याति संभवानेकविंशतिन!!’ हे सारे सनातन धर्मच.’

अशी उदाहरणे देत सावरकरांनी सनातन धर्माचे स्वरूप उघड केले आहेयामुळे त्यावर जोरदार ताशेरे ओढताना सावरकर लिहितात कीया अनेक प्रसंगी अगदी परस्परविरुद्ध असणाऱ्या विधिनिषेधांस आणि सिद्धान्तांस सनातन धर्म हाच शब्द लुगेसुंगे भाबडे लोकच लावतात असे नसून आपल्या साऱ्या स्मृतिपुराणांतील सनातन धर्मग्रंथांतूनच ही परंपरा पाडलेली आहेवरील प्रकारच्या साऱ्या मोठ्याधाकट्याव्यापकविक्षिप्तशतावधानीक्षणिक आचारविचारांच्या अनुष्टुपाच्या अंती अगदी ठसठशीतपणे ही एकच राजमुद्रा बहुधा ठोकून दिलेली असते कीएषा धर्मस्सनातनः!' 

रिवाजरितीभाती प्रचलित प्रथापरंपरा यावर खरे म्हणजे सावरकरांनी चांगलेच ताशेरे ओढले आहेतत्यांच्या सनातन या संकल्पनेची व्याख्या ही वेगळी होती आणि धर्म या शब्दाची व्याप्तीही वास्तव होतीमात्र ती आजही समजलेली नाहीहिंदु असो वा मुस्लीमख्रिश्चन यांनी अद्ययावत वा विज्ञानवादी दृष्टीपासून पळ काढत प्रथापोथीला कवटाळले आहेही स्थिती आजही कायमच आहेयालाच धर्म म्हणताना कोणी मुस्लीम तर कोणी हिंदु तर कोणी ख्रिश्चनही ठरवतोयामुळेच वास्तवाकडे पाठ करून भावनिक आणि पारंपरिकतेला धर्म मानण्याचा अट्टाहास आजही चालूच आहे.

(क्रमश:)

रवींद्र यशवंत बिवलकर 

शुक्रवार, २६ मे, २०२३

  सावरकर : कालआज आणि उद्या    

माझ्या नजरेतून - 

 सावरकरांच्यादृष्टीने धर्म
चित्र- चित्रकार योगेंद्र पाटील, पाचोरा

अहिंदु असणाऱ्यांना स्वातंत्र्यानंतरही काय स्थान राहील हे सावरकरांनी हिंदु महासभेच्या भाषणांमधून सातत्याने स्पष्ट केले आहेमात्र तरीही मुस्लिमांना नेमके ते न कळू देण्याच्या भूमिकेतून आणि मुस्लिमांच्या पुढे लाचारी पत्करीत वा मतांसाठी लाचार होत काँग्रेससारख्या पक्षाने केलेली सुरुवात ही मुस्लिम धर्मियांनाही घातक होऊन बसली आहेहे त्यांनाही लक्षात येऊ नयेयासारखे मुस्लिमांचे दुर्दैव नाहीअलीकडच्या काळात मुस्लिम समाजाला वा धर्मीयांना सुधारण्यासाठी सत्यशोधक  मंडळासारख्या फारच थोड्या संघटना आणि व्यक्तींचे प्रयत्न झालेले दिसतात.

 आसिंघु-सिंधुपर्यंता यस्य भारतभूमिका।

पितृभूपुण्यभूश्चैव स वै हिदुरिति स्मृत।।

ही व्याख्या दृढ करण्यामागील सावरकरांची भूमिका ही देखील राजकीय आणि हिंदुसंघटकाची आहेहिंदुसंघटक म्हणून जातीयतेचा वास घेणाऱ्यांना हिंदु असणाऱ्यांनाही ही व्याख्या नेमकी उमजत नाहीहे दुर्दैव आहेमुळात भारतावर झालेल्या विविध आक्रमणांमुळे धर्मांतरे झालीया धर्मांतरामुळे झालेल्या नकारात्मक मानसिकतेमधून  हिंदुंना अस्तित्त्वाची जाणीव करण्याचे काम अनेकदा काळाकाळामध्ये अनेकांनी केलेत्यात अलीकडच्या काळातील बुद्धिवादातून हिंदुत्त्वाला साकारणारे आणि भूमिनिष्ठविज्ञाननिष्ठतेमधून हिंदुना नव्या आधुनिकतेकडे नेऊ पाहाणारे सावरकर हे द्रष्टे होतेत्यामुळेच हिंदुंचे संघटन वा त्यांचे महत्त्व हे केवळ सत्ता मिळविण्यासाठी नव्हे तर जगामध्ये ज्या भूमीवर पूर्वीपासून मालकी असूनही वा जी भूमी त्यांच्या पूर्वापार पिढ्य़ांपासून आपली असल्याचे ज्ञात असूनही पराभूताच्या मानसिकतेत जगणाऱ्या हिंदुना जागृत करण्याचे मुख्य उद्दिष्ट सावरकरांचे होतेया उद्दिष्टातून त्यांनी मूलतयाच भूमीत वाडवडील जन्मलेल्या आणि त्यांचीही धार्मिक नाळ समान असलेल्या अन्य धर्मांतरित व्यक्तींना पुन्हा धर्मात घेण्याचे महत्त्वाचे काम करून मानसशास्त्रीय दृष्टीने निखळलेला सांधा पुन्हा जोडण्याचा प्रयत्न सावरकरांनी केलाछत्रपती शिवाजी महाराजांनंतर आधुनिक काळात झालेला हा प्रयत्न ज्या काही नामांकितांनी केलात्यात सावरकर हे अद्यतनी असून धर्म या संकल्पनेला भूमीशी नाळ जोडणाऱ्यांमधील एक बीजकर्तेच होतेपण त्याचे महत्त्व आजही ना हिंदुना जाणवले ना मुस्लिमांना जाणवले ना ख्रिश्चनांना जाणवलेहे असे काम सावरकर का करू शकलेकिंवा का करीत होतेकारण धर्म या पारंपरिक संकल्पनेला त्यांनी नेमके ओळखले होतेआधुनिक काळासाठी धर्मरिवाज परंपरात्यातील बेड्या तोडण्याची गरज प्रतिपादित करतानाच त्यांनी धर्माभिमानापेक्षा पुण्यभू या शब्दाला महत्त्व देत हिंदुंना त्यांचे हिंदुत्त्व समजावून दिलेयामुळेच त्यांचे हिंदुत्त्व हे भूमिनिष्ठविज्ञानिष्ठ आणि समाजमनालामाणसाला अद्ययावत करण्याचे त्यांचे कार्य ज्याला समजेल तोच खरा हिंदु आणि अहिंदु यातील फरक कळून घेऊ शकेल.

अहिंदु असणाऱ्यांना स्वातंत्र्यानंतरही काय स्थान राहील हे सावरकरांनी हिंदु महासभेच्या भाषणांमधून सातत्याने स्पष्ट केले आहेमात्र तरीही मुस्लिमांना नेमके ते न कळू देण्याच्या भूमिकेतून आणि मुस्लिमांच्या पुढे लाचारी पत्करीत वा मतांसाठी लाचार होत काँग्रेससारख्या पक्षाने केलेली सुरुवात ही मुस्लिम धर्मियांनाही घातक होऊन बसली आहेहे त्यांनाही लक्षात येऊ नयेयासारखे मुस्लिमांचे दुर्दैव नाहीअलीकडच्या काळात मुस्लिम समाजाला वा धर्मीयांना सुधारण्यासाठी सत्यशोधक  मंडळासारख्या फारच थोड्या संघटना आणि व्यक्तींचे प्रयत्न झालेले दिसतातस्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यादृष्टीने धर्म या शब्दाची व्य़ाख्या वा अर्थ किंवा त्या संकल्पनेचे नेमकेपण काय आहे ते पाहाण्यासारखे आहेविज्ञानिष्ठ निबंधामध्ये त्यांनी धर्माबाबत खूप नेमकेपणाने स्पष्ट केले आहेत्यांच्या धर्मासंबंधातील या नेमकेपणाच्या निष्कर्षातून त्यांचे बुद्धिवादाविषयक मार्ग लक्षात येतात.  हिंदुत्वाची त्यांची नेमकी व्याख्यात्यांची संकल्पना समजू शकतेधर्म म्हणजे नेमके कायत्यामागची धारणा काय आदी बाबींची शहानिशा करणे म्हणजे बुद्धिवादाचे महत्त्वाचे काम आहेअद्ययावत होण्यासाठी सावरकरांचा हाच दृष्टिकोन पाहाणे गरजेचे आहेकारण याच दृष्टिकोनामुळे सावरकर यांची विज्ञाननिष्ठासमाजाविषयीचा दृष्टीकोनधर्मांबद्दलचे मतहिंदुस्थानाबद्दलचा अभिमानपूर्ण मागोवाइतिहासाचे त्यांचे आकलन आणि नव्या युगातील संभाव्य बदलाचाही त्यांना मिळालेला कानोसा वा अंदाज असे सारे घटक यातून स्पष्ट होत जातात

धर्म हा जगात अतिशय महत्त्वाचा घटक असून वैयक्तिकसामाजिक इतकेच नव्हे तर राज्यसंस्था वा राजसत्ता यांना ठरविणे वा स्वीकारणे वा उभी करणे यात धर्माने अतिशय महत्त्वाची कामगिरी केली आहेया धर्माचे म्हणूनच चिकित्सकपणे मूल्यमापन होणे आवश्यक आहेकिंबहुना यामुळेच धर्माच्या संकल्पनेला अफूची गोळी असे जरी साम्यवाद्यांनी म्हटले तरी त्या धर्माचे महत्त्व ते नाकारू शकले नाहीतत्या साम्यवाद्यांमधील अनेकांना आजही धर्मसंस्थेच्या आधारे असलेल्या काही समाजघटकांनाही आपल्यामध्ये सामावणे गरजेचे वाटतेत्यातून त्यांना त्यांचा स्वार्थही साधता येतोहे देखील एक दुर्दैवच म्हणावे लागतेसावरकरांच्यादृष्टीने मानवकल्याण वा त्याचे हित हेच महत्त्वाचे होतेत्यांनी त्याचदृष्टीने धर्माची व्यवच्छेदक व्याख्या करण्याचा वा त्याचे नेमके स्वरूप शोधण्याचा वा जाणण्याचा प्रयत्न केलातो बऱ्याच अंशी आजही अचूक वाटतोसावरकर यांनी धर्माचे विविध अर्थच सांगितले आहे.  त्याचा व्यापक असा अर्थ नियम असा असून एखाद्या वस्तूचे अस्तित्त्व वा व्यवहार याचे नियमन करतो तो त्या वस्तुचा धर्म आहेम्हणजे सूर्याचा धर्म प्रकाश देण्याचा आहे तर आगीचा धर्म जाळण्याचा आहेथोडक्यात त्या वस्तुचा नैसर्गिक गुण वा नियम अर्थात त्या वस्तुचा वा संकल्पनेतचा तो गुणधर्म् आहेते त्या वस्तुचे वैशिष्ट्य आहे.  अशा प्रकारे निसर्ग वा निसर्गाच्या मुळाशी असणारा नियम वा त्याला नियंत्रणात ठेवणारी शक्ती तिचा शोध वा विचार आहे असे शोध वा ज्ञान हा धर्मच आहे.

संदर्भ - सह्याद्री मासिक मे १९३६

(क्रमश:)

रवींद्र यशवंत बिवलकर

फिर सुबह होगी .... पण कधी?

सुबह कभी तो आयेगी... हे गाणे आज नेहरूवादी नसलेल्या  व नेहरूंच्या राजवटीवर आसुड ओढणाऱ्या विचारसरणीच्या सत्ताधारी ‘भाजपवादी’ अशा १० वर्षांच्या...